![](https://www.navgannews.in/wp-content/uploads/2023/08/Screenshot_20230807_081201-1.jpg)
पनवेल: तळोजा एमआयडीसीमधून वाहणारी कासाडी नदीमधील रासायनिक केमिकल मिश्रित पाणी पिल्याने आठ बकऱ्या मृत्युमुखी पावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
नावडे येथील बुधा अनंता म्हात्रे या शेतकऱ्याचे या बकऱ्या आहेत.
तळोजा मधील प्रदूषण चिंतेची बाब आहे. प्रदूषणावरून स्थानिक माजी नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी राष्ट्रीय हरित लवादामध्ये याचिका दाखल केली आहे.येथील प्रदूषण रोखण्यास अधिकारी तसेच तलोजा एमआयडीसी व पनवेल महानगरपालिका जनतेच्या जीवाशी खेळत असल्याचा आरोप म्हात्रे यांनी केला आहे.