ताज्या बातम्या

छत्रपती संभाजी नगर जिल्ह्याची माहिती


: छत्रपती संभाजीनगर (पूर्वीची नावे औरंगाबाद व खडकी) हे महाराष्ट्र राज्यातील एक शहर आहे आणि मराठवाडा विभागाचे मुख्यालय आहे. हे एक महत्त्वाचे मध्यवर्ती, औद्यौगिक केंद्र व ऐतिहासिक पर्यटनकेंद्र आहे. या शहराला ५२ दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ सुद्धा येथे आहे. हे जगातले एक सर्वाधिक वेगाने वाढणारे औद्यौगिक शहर आहे. हे मराठवाड्याच्या व त्यासोबतच महाराष्ट्र पर्यटनाच्या राजधानीचे शहर आहे.
या शहराला औरंगाबाद हे नाव औरंगजेब ह्या मुघल सम्राटाच्या नावावरून ठेवले गेले होते. त्यापूर्वी या शहराचे जुने नाव खडकी होते. औरंगाबाद शहराचे नाव बदलून “संभाजीनगर” करण्याचा निर्णय सर्वप्रथम माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात २९ जून २०२२ रोजी आणि तदनंतर १७ जुलै २०२२ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात ‘छत्रपती संभाजीनगर’ असे नाव मंजूर झाले. पुढे २४ फेब्रुवारी २०२३ रोजी नरेंद्र मोदी सरकारने औरंगाबाद शहराच नाव बदलून “छत्रपती संभाजीनगर” देण्यास मंजुरी दिली.औरंगाबाद विभाग, जिल्हा, शहर, व तालुकयाच ‘छत्रपती संभाजीनगर’ असे नामंतरा विषयी सर्वोच्च न्यायालयाने जून 2023 पर्यन्त स्थगिती दिली आहे

पैठण ही सातवाहन राजघराण्याची शाही राजधानी, तसेच दौलताबाद किंवा देवगिरी ही यादव घराण्याची राजधानी, आधुनिक छत्रपती संभाजीनगरच्या हद्दीत स्थित आहेत. इ.स. १३०८ मध्ये इस्लामिक आक्रमक सुलतान अलाउद्दीन खलजीच्या कारकिर्दीत हा प्रदेश दिल्ली सल्तनतला जोडला गेला होता. १३२७ मध्ये, दिल्ली सल्तनतची राजधानी दिल्लीहून दौलताबाद (सध्याच्या संभाजीनगरमध्ये) येथे वेडा महंमद उर्फ सुलतान मुहम्मद बिन तुगलकांच्या कारकिर्दीत स्थानांतरित झाली, ज्याने दिल्लीच्या लोकसंख्येचे मोठ्या प्रमाणावर दौलताबाद येथे स्थलांतर करण्याचे आदेश दिले. तथापि, मुहम्मद बिन तुघलक यांनी १33४ मध्ये आपला निर्णय बदलला आणि राजधानी दिल्लीला परत नेली. १४९९ मध्ये, दौलताबाद अहमदनगर सल्तनतचा एक भाग बनला. इथिओपियाचे लष्करी नेते मलिक अंबर यांनी अहमदनगर सल्तनतची राजधानी म्हणून सेवा बजावण्यासाठी आधुनिक संभाजीनगरच्या ठिकाणी १६१० मध्ये खडकी नावाचे नवीन शहर स्थापन केले. अहमदनगर सल्तनतचे मलिक अंबर याच्यानंतर त्याचा मुलगा फतेह खान यांनी नाव बदलून फतेहनगर केले. १६३६ मध्ये औरंगजेब, जो त्यावेळी दख्खन प्रांताचा मोगल वाइसरॉय होता, त्यांनी या शहराला मोगल साम्राज्यात जोडले. १६५३ मध्ये औरंगजेबाने शहराचे नाव बदलून “औरंगाबाद” केले आणि त्यास मुगल साम्राज्याच्या दख्खन प्रदेशाची राजधानी बनविली. १७२४ मध्ये दख्खनचा मोगल गव्हर्नर निजाम असफ प्रथम, पहिला मोगल साम्राज्यातून निघाला आणि त्याने स्वतःच्या असफ जाही राजवंशाची स्थापना केली. १७६३ मध्ये हैदराबाद शहराकडे त्यांची राजधानी हस्तांतरित होईपर्यंत संभाजीनगरला हैदराबादची राजधानी बनवले होते. ब्रिटीश राजवटीत हैदराबाद राज्य एक राजसत्ता बनले आणि १५० वर्षे ते तसे राहिले. १९५५ पर्यंत छत्रपती संभाजीनगर हे हैदराबाद राज्याचा भाग राहिले. १९६० मध्ये छत्रपती संभाजीनगर व मराठी भाषिक मराठवाडा हा महाराष्ट्र राज्याचा एक भाग बनला.[६]

औरंगाबाद हे शहर ज्या परिसरात वसलेले आहे, त्याचा इतिहास सातवाहन या काळापर्यंत आढळून येतो. विक्रमादित्य राजाच्या काळातही या परिसराचा उल्लेख आहे. सातवाहनाच्या काळात खाम नदीकिनारी अनेक लहान मोठी खेडी होती. त्यापैकी एक असलेले खडकी हे आजचे छत्रपती संभाजीनगर मानले जाते आहे. सातव्या शतकात या गावाच्या उत्तरेस बुद्धलेणी व विहार खोदण्यात आले. नंतरच्या शतकामध्ये या गावाचा राजतलक किंवा राजतडाग म्हणूनही उल्लेख आढळतो. चौदाव्या शतकापर्यंत या परिसरात देवगिरीच्या महान हिंदू साम्राज्याचे सम्राट राजे कृष्णदेव राया यांच्या वंशजांचे यादवांचे राज्य होते. त्या काळात येथे फार मोठ्या प्रमाणात भरभराट झाली. देवगिरी या प्रदेशाचा सुवर्णकाळ होता.
: सतरावे शतक
संपादन करा
इतिहासकारांच्या मते १६०४ मध्ये अहमदनगरचा निजामशहा मूर्तझा द्वितीय याचा मंत्री मलिक अंबर याने औरंगाबाद हे शहर वसवले आहे. परंतु हे गाव पूर्वीपासूनच अस्तित्वात होते मलिक अंबरने फक्त त्याचे नाव बदलून फतेहपूर ठेवले होते. १६३४ मध्ये औरंगजेब ह्या (खडकी/फतेहपूर) शहरात दख्खन विभागाचा सुभेदार म्हणून आले. १६४४ मध्ये तो आग्ऱ्याला परत गेले. त्यानंतर १६८१ मराठा साम्राज्याचा बिमोड् करण्यासाठी मध्ये औरंगजेब पुन्हा ह्या शहरात आले. १७०७ मध्ये औरंगजेब याचे अहमद नगर येथे निधन झाले. औरंगाबाद शहराजवळ असणाऱ्या खुलताबाद तालुक्यात औरंगजेब यांची कबर आहे.

अठरावे शतक
संपादन करा
इ.स. १७०७ नंतर औरंगाबादचा ताबा हैदराबादच्या निझाम राजवटीकडे आला.

एकोणिसावे शतक
संपादन करा
इ.स. १८८९ मध्ये औरंगाबाद मध्ये पहिली कापूस प्रक्रिया गिरणी उभी राहिली, त्यात सातशे जणांना रोजगार मिळाला.

विसावे शतक
संपादन करा
निझाम राज्यात हैदराबाद-गोदावरी व्हॅली रेल्वेची सुरुवात झाल्यानंतर इ.स. १९०० च्या सुमारास शहर आणि परिसरात अनेक जिनिंग कारखाने सुरू झाले. औरंगाबादला महाविद्यालय सुरू झाले आणि उच्च शिक्षणाची मुहुर्तमेढ रोवली गेली. शहरात पदवीशिक्षण घेतलेल्यांची संख्या वाढली. उद्योगव्यवसायाला प्रारंभ झाला. विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत हैदराबाद संस्थांनातही देशाच्या अन्य भागाप्रमाणेच स्वातंत्र्यासाठी चळवळ सुरू झाली होती. हैदराबाद स्टेट काँग्रेसच्या नेतृत्वाखाली लढा उभारला गेला. औरंगाबाद हे या लढ्याचे एक केंद्र बनले. हैदराबाद संस्थानाच्या विलीनीकरणानंतर मराठवाड्यासह औरंगाबाद शहर ही भाषिक आधारावर महाराष्ट्राशी जोडण्यात आले. संयुक्त महाराष्ट्राची स्थापना १ मे, १९६०ला झाली. त्या दिवशीपासून औरंगाबाद महाराष्ट्राचा भाग बनले.

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर व्हावे अशी ईच्छा व्यक्त केली होती.[७][८] २९ जून २०२२ रोजी औरंगाबाद शहराचे नाव बदलून ‘संभाजीनगर’ करण्याचा निर्णय उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात मंजूर झाला. त्यानंतर औरंगाबाद या शहराला ‘छत्रपती संभाजीनगर’ करण्याचा निर्णयास २४ फेब्रुवारी २०२३ ला नरेंद्र मोदी सरकार कडून मंजूरी देण्यात आली.
: छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका ही छत्रपती संभाजीनगर शहराचा कारभार पाहणारी स्थानिक स्वराज्य संस्था आहे. एकूण आठ झोन मध्ये ११८ वॉर्डात महानगरपालिका क्षेत्राची विभागणी झाली आहे. शहरालगतच्या लष्कराच्या ताब्यातील परिसराचा कारभार पाहण्यासाठी छत्रपती संभाजीनगर छावणी मंडळ (कॅन्टोन्मेंट बोर्ड) ही संस्था अस्तित्वात आहे.
लोकसभा, विधानसभेत प्रतिनिधित्व
संपादन करा
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात संपूर्ण औरंगाबाद शहराचा समावेश होतो. महाराष्ट्राच्या विधानसभेच्या तीन जागा क्षेत्रात प्रामुख्याने आहेत.औरंगाबाद (पूर्व) औरंगाबाद (मध्य) आणि औरंगाबाद (पश्चिम) अशी या तीनही विधानसभा मतदारसंघांची नावे आहेत

गुजरात आणि सिंधमधील व्यापारी ठाण्यांना दक्षिण भारताच्या व्यापारी केंद्रांशी जोडणारा महत्त्वाचा मार्ग औरंगाबाद जात होता. याच मार्गावरचा महत्त्वाचा थांबा म्हणून औरंगाबाद विकसित झाले असावे असे मानता येते. शहरात गुजराती व्यापारी समाजाचे वास्तव्य ऐतिहासिक काळापासून आहे. कापूस लोकर आणि वनस्पतीजन्य तेलांचा व्यवसाय इथे ऐतिहासिक काळापासून चालतो

कापूस आणि रेशीम यांच्या एकत्रीकरणातून तयार झालेल्या हिमरू नावाच्या वस्त्रप्रकारासाठी औरंगाबाद ओळखले जाते. पैठणी या नावाने आजही लोकप्रिय असलेल्या रेशमी साड्यांचे उत्पादनही छत्रपती संभाजीनगर परिसरात मोठ्या प्रमाणात होई. पैठण या औरंगाबाद जवळच्या गावाच्या नावावरूनच या प्रकाराचे नाव पडले. हिमरू शाली आणि पैठण्यांच्या व्यवसायाची कालौघात बरीच पडझड झाली असली तर औरंगाबाद सिल्क मिल्स आणि स्टॅंडर्ड सिल्क मिल्स सारख्या उद्योगांमध्ये आजही रेशमी आणि हिमरू वस्त्रांचे उत्पादन चालते. औरंगाबादमध्ये औद्यौगिक वसाहती १९७० च्या दशकात सुरू झाल्या.

उद्योगधंदे
संपादन करा
येथील एमआयडीसी (महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेन्ट काॅर्पोरेशन) बरीच मोठी असून येथे स्वयंचलित वाहने आणि वाहनांचे सुटे भाग, घरातील वापराच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू, बिअर आणि व्हिस्की, चामडे, औषधनिर्मिती, रबर, बी-बियाणे आणि कीटकनाशके ही औरंगाबादतील प्रमुख उत्पादने होत. निर्लेप, लुपिन लॅबोरेटरी, ग्रीव्ह्ज कॉटन लिमिटेड, गरवारे पॉलिस्टर्स, औरंगाबाद सिल्क मिल्स, केविल सोल्यूशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांचे प्रकल्प आहेत. शिवाय अनेक भारतीय आणि परदेशी बहुराष्ट्रीय कंपन्या आणि उद्योगसमूहांचे कारखाने औरंगाबादमध्ये आहेत. अनेक नवीन उद्योग उभे राहत आहेत. ही एमआयडीसी पुणे रस्त्यावर आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *