![](https://www.navgannews.in/wp-content/uploads/2023/11/Screenshot_20230921_104715-1-1-1-1-1-1.jpg)
मध्य प्रदेश मध्ये एका महिलेने आपल्या पुतण्यावर अपहरण करून हल्ला केल्याचा आरोप केला आहे. महिलेचा आरोप आहे की, चाकूच्या धाकावर तिचे अपहरण करण्यात आले आणि नंतर जीवघेणा हल्ला करण्यात आला.
मानेवर वार केल्याने महिला गंभीर जखमी झाली. प्रकरण बहोदापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आनंद नगर भागातील आहे. आरोपी तरुण आणि जखमी महिला काकू आणि पुतण्या आहे. जखमी महिलेचा आरोप आहे की, पुतण्याने आपल्याशी लग्न करण्यासाठी हट्ट धरला होता. मात्र तिने नकार दिल्याने त्याने वार करून तिला जखमी केले. नात्याचे कारण देत तिने लग्नास नकार दिल्याचे महिलेचे म्हणणे आहे. चिडलेल्या तरुणाने चाकूच्या धाकावर तिचे अपहरण केले. घटनेपासून आरोपी फरार आहे. सध्या या प्रकरणाचा तपास बहोदापूर पोलीस करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, जखमी महिलेचे वय 37 वर्षे असून आरोपी तरुणाचे वय 29 वर्षे आहे. दोघेही आनंद नगर परिसरात राहतात. पीडित महिलेने सांगितले की, गुरुवारी संध्याकाळी ती किल्ला गेट परिसरात जात असताना वाटेत तीचा पुतण्या दुचाकीवर आला आणि लग्नासाठी हट्ट करू लागला.
मानेवर चाकूने वार झालेल्या महिलेवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आरोपीविरुद्ध कलम ३०७ अन्वये हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.