ताज्या बातम्या

सावित्रीबाई फुले माहिती


सावित्रीबाई फुले, भारतातील पहिल्या महिला शाळेची पहिली महिला शिक्षिका ही एक अग्रणी व्यक्ती आहे. प्रबळ जातीव्यवस्थेविरुद्ध तिने निर्भयपणे लढा दिला आणि उपेक्षित लोकांच्या उन्नतीसाठी कार्य केले.तिने सर्व महिलांच्या सन्मानाची मागणी केली, यासाठी तिने पती ज्योतिराव फुले यांच्यासह आयुष्यभर काम केले. तिच्यासाठी मानवता, समानता, स्वातंत्र्य आणि न्याय ही तत्वे अत्यंत महत्त्वपूर्ण होती. ज्या काळात स्त्रिया केवळ वस्तू होती, तिने एक स्पार्क पेटविला ज्यामुळे शिक्षणात समानता निर्माण झाली – जे अशक्य होते जे यापूर्वी अशक्य होते.तिने स्त्रियांवर लादलेल्या भेदभाववादी सीमांच्या विरोधात जोरदारपणे भाष्य केले ज्यामुळे त्यांच्यावर अत्याचार होऊ लागले. भारतातील सामाजिक मुक्तीसाठी धर्मनिरपेक्ष शिक्षणावर तिचा भर हा तिच्या महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्त्वाचा ठसा आहे. तिचे संघर्ष आणि कष्ट समजून घेऊन तिचे अधिक चांगले ज्ञान घेऊन आपण अशा जीवनाकडे पहात आहोत ज्याने केवळ भारतातील शिक्षणाचा चेहराच बदलला नाही, तर मानवतेला खऱ्या अर्थाने प्रबुद्ध केले.

फुले दांपत्या पूर्वीची परिस्थिती

१८ व्या शतकाच्या शेवटी व १९ व्या शतकाच्या सुरुवातीला पुण्यात पेशवाईचा गोंधळ सुरू होता. पेशवाईचा हा काळ म्हणजेच मानव संस्कृतीला काळिमा फासणारा, असे इतिहासकार म्हणतात. या गोंधळाचा फायदा इंग्रजानी घेऊन सन १८१८ मध्ये मराठी राज्य ताब्यात घेण्यास सुरुवात केली आणि नवीन युगाची सुरुवात झाली.

पेशवाईच्या काळात शूद्र-अतिशूद्रांची स्थिती भयानक अवस्थेत होती. शूद्रांची सावली ब्राह्मणावर पडणार नाही, अशा पद्धतीने अंग चोरून चालावे लागत असे. थुकीचा विटाळ ब्राह्मणांना होऊ नये. म्हणून गळ्यात मडके बांधून फिरावे लागत असे. शूद्रांच्या पावलांचे ठसे रस्त्यावर उमटून त्याचा विटाळ ब्राह्मणाला होऊ नये म्हणून हे पावलांची ठसे पुसून काढण्यासाठी कमरेला झाडू बांधून फिरावे लागत असे. या भयानक परिस्थितीच्याही पलीकडे स्त्रियांना जीवन जगावे लागत असे. स्त्रीला एक भोगवस्तू म्हणून पाहिले जात होते.

या काळात पेशवे आणि सरदारांच्या चंगीभंगी चाळ्यांनी स्त्रियांना समाजात वावरणेही अशक्य झालेले होते. मुला-मुलींची लग्नेही पाळण्यात लावण्याची रूढी निर्माण झाली होती.लग्न म्हणजे काय हे कळण्याच्या आतच मुलीचा नवरा मेला तर तिला जन्मभर समाजात अपमानित जीवन जगावे लागत असे. अशा परिस्थितीत एखाद्या वाईट पुरुषाची शिकार बनून गर्भ राहिला तर त्याचासर्व दोष पुन्हा या निष्पाप मुलीच्याच माथी मारायचा आणि काळे तोंड लपविण्यासाठी त्या कोवळ्या मुलीला आत्महत्या करण्यापलीकडे मार्गच राहत नसे.

ब्राह्मण समाजात तर विधवा स्त्रीला केस कापून एका कोंडवाड्यात विद्रूप जीवन जगावे लागत असे. जर घरातील व्यक्तीने तिच्यावर बलात्कार केला आणि गर्भ राहिला तर तिला विहीर-तलावात बुडवून मारत असत. जर पती मेला तर त्याच्याबरोबर सरणावर जिवंत स्त्रीला जाळून मारीत असत. या पद्धतीला सती जाणे असे म्हणतात. अशा हीन अवस्था स्त्रियांना भोगावे लागत होते.काळाकुट पेशव्यांचा अंधार काढून नवीन प्रकाश देणारे इंग्रज आले आणि या काळात एका महान पुरुष आणि स्त्रीचा जन्म झाला ते महान स्त्री-पुरुष म्हणजे फुले दांपत्य होय.

सावित्रीबाई फुले यांचे बालपण

सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यात शिरवळ गावाजवळील शंभरदीडशे घराची वस्ती असलेल्या एका छोट्याशा नायगाव खेड्यात खंडोजी नेवासे पाटील राहत होते. त्यांच्याकडे गावच्या पाटीलकीचा मान होता. त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई घरकाम करीत असत. या दोघांचाही मनमिळावू स्वभाव होता; परंतु हा भाग अवर्षणाचा असून वर्षानुवर्षे दुष्काळाची परंपरा लाभलेली आणि शूद्र मागासवर्गीय म्हणून शिक्षणापासून वंचित असलेले कुटुंब होते. या गरीब शेतकरी कुटुंबात लक्ष्मीबाई खंडोजी पाटलाच्या घरी ०३ जानेवारी १८३१ रोजी सावित्रीबाईचा जन्म झाला. खंडोजी नेवासे पाटलांना नंतर तीन मुलं झाली. त्यामुळे सावित्री व तिचे सिद्जी, सखाराम आणि श्रीपती असे चौघेजण नेवासे कुटुंबात वाढत होते. सावित्री वडील बहीण असल्यामुळे आपल्या भावांना भरपूर प्रेमाने सांभाळून आईला मदत करीत होती.

त्याकाळी मागासवर्गीयांनी शिक्षण घेणे पाप होते. शूद्रांनी शिक्षण घेतले तर ब्राह्मणांचा वैदिक (हिंदू) धर्म बुडत होता. त्यामुळे सावित्रींना शिक्षण घेण्याचा प्रश्नच आला नाही. पूर्वी मुला-मुलींची लग्न बारा वर्षांच्या आतच बालवयात करण्याची प्रथा होती.

सावित्री नऊ वर्षांची झाली आणि खंडोजी पाटलांना मुलीच्या लग्नाची काळजी लागली. आणि मुलाचा शोध घेऊ लागले. सावित्रीसाठी पुण्याचे स्थळ घर चालून आले. पुण्यात भाजीपाला व फुलांचा व्यवसाय करणारे गोविंदराव फुले यांनी सुपुत्र जोतिबांसाठी खंडोजी नेवासे पाटलांकडे सावित्रीसाठी मागणी घातली. त्यावेळी जोतिबाचे वय तेरा वर्षांचे होते. जोतिबा- सावित्रीचा लग्नाचा योग जुळून आला. सन १८४० मध्ये सावित्रीचे जोतिबाबरोबर लग्नसोहळा पार पडला. सावित्री आता सासरी पुण्यात गोविंदराव फुले यांच्या घरी ९ व्या वर्षी नांदावयास आली.

गोविंदराव फुले

फुले घराणे मूळचे सातारा जिल्ह्यातील कटगुण गावचे. त्यांचे मूळ आडनाव गोहे होते. गोविंदराव फुलेंचे आजोबा कटुगण गावचे चौगुले होते. एकेदिवशी गावातील कुलकर्णी यांच्याबरोबर चौगुल्यांचे भांडण झाले. कुलकर्णी चौगुल्यांचा छळ करू लागला.या छळाला कंटाळून चौगुल्यांनी कुलकर्यांस ठार मारले. तेव्हापासून चौगुल्यांनी कटगुण कायमचे सोडून पुरंदर तालुक्यातील खानवडी गावी राहू लागले. येथे चौगुल्यांना मुलगा झाला. त्याचे नाव शेटीबा ठेवण्यात आले. शेटीबा हा आळशी, चैनी व उधळ्या स्वभावाचा निघाला आणि घरात गरिब परिस्थिती आली. शेवटी शेटीबा उदरनिर्वाहसाठी कुटुंबासह पुण्यात कामाला आला.

शेटीबा गोहे याना राणोजी, कृष्णा, गोविंद असे तीन मुलं होती. गरिबीमुळे त्या मुलांना मोलमजूरी करून कुटुंबाचे गुजराण करावे लागत असे.ते तिघे गोहे बंधू एका फुलाच्या व्यापाऱ्याकडे नोकरीस लागले. त्यांनी फुलाच्या व्यवसायात प्राविण्य मिळविले. पुढे या गोहे बंधूनी फुलाचा स्वतंत्र व्यवसाय सुरू केला. या व्यवसायात गोहे बंधूची व्यापाऱ्यात गणना होऊ लागली. पुढे या गोहे बंधुना पेशव्याकडून मागणी येऊ लागली. पेशव्यांना फुलांपासून बनविलेल्या फुलांच्या गाद्या, उशा, चटया आणि फुलांचे पोशाख पुरवू लागले. त्यांच्या कामातील कौशल्य पाहून पेशव्यांनी आपल्या बागेत प्रमुख माळी म्हणून नेमणूक केली. त्यांच्या कामावर खुश होऊन पेशव्यांनी त्या तिघा गोहे बंधुना ३५ एकर जमीन इनाम दिली. त्या ३५ एकरात त्यांनी बाग फुलविली. त्यावेळेपासून गोहे बंधुना फुले म्हणू लागले.

या काळात पेशवाईत बदल घडले. दुसरा बाजीराव पेशवा पुण्याच्या गादीवर बसला. तो उधळ्या, स्त्रीलंपट आणि क्रूर निघाल्यामुळे पेशवाई संपुष्टात येऊन सन १८१८ मध्ये पेशवाई समाप्त झाली. आणि इंग्रजी अंमल सुरू झाला. या काळात गोविंदराव फुले यांना ११ एप्रिल १८२७ मध्ये मुलगा झाला. त्याचे नाव जोती ठेवण्यात आले.

जोती नऊ महिण्याचा असताना आई चिमणाबाईचे निधन झाले. चिमणाबाई गोविंदराव फुले यांना राजाराम, जोती ही दोन मुलं होती. चिमणाबाईंच्या निधनामुळे गोविंदराव अत्यंत दुःखी झाले. गोविंदराव फुल्यांनी दुसरे लग्न न करता जोतीच्या देखभालीसाठी नात्यातील शाडूची मुलगी जोतीची मावसबहीण सगुणाबाई क्षीरसागर यांच्यावर सोपविली. सगुणाबाईंने राजाराम व जोती यांचा डोळस मायेनं सांभाळ केला.

आता जोतीचे लग्न झाल्यामुळे सावित्री घरात आली होती. घरात सावित्रीला सगुणाबाईचा आधार होताच. सगुणाबाईचचा नवरा वारला आणि मोहरी कुणीही नसल्या कारणाने त्या जॉन या मिशनऱ्याकडे मुलांना सांभाळण्याचे काम करीत. त्यामुळे सगुणाबाईला शिक्षणाची आवड होती. त्यामुळे गोविंदरावाचे मन वळवून जोतीना शाळेत घातले. परंतु शूद्रांनी शिक्षण शिकणे सनातनी ब्राह्मणाला समजताच त्यांनी गोविंदरावांचे कान फुकले आणि जोतीला प्राथमिक शिक्षणानंतर काढून घेतले. गोविंदरावाचे मित्र गफार बेग व लिजीट साहेब यांनी गोविंदरावांना सांगून जोतिबांच्या शिक्षणासंदर्भात मन वळविले.

सावित्रीबाई फुले यांचे शिक्षण

त्याकाळी बालविवाह करण्याची प्रथा होती. त्यामुळे बालवयाच्या नवव्या वर्षीच सासरी येण्याचा योग सावित्रीबाईला आला होता. शूद्रांना शिक्षणाचा अधिकार नसल्याने त्यांच्यासाठी शाळा नव्हती. त्यामुळे सावित्रीला शिक्षणाचा गंधही नव्हता. शाळेचे कधी तोंडच पहाण्याचा योग आला नव्हता.

इंग्रजांनी शाळा सुरू केल्यामुळे जोतीबांना तीन वर्गापर्यंत शिक्षण घेऊन ब्राह्मणांच्या दबावामुळे शाळा सोडले होते. परंतु गोविंदरावांचे मित्र आणि सगुणाबाई यांनी आग्रह केल्यामुळे जोतिबांना पुढचे शिक्षणासाठी स्कॉटिश मिशनच्या इंग्रजी शाळेत टाकण्यात आले. जोतीराव शिक्षण घेत होते, सोबतच वडिलांना शेतीतील कामात मदत करीत होते.

दुपारच्या वेळी आपण शाळेत काय शिकत आहोत, हे सावित्रीला , जोतिराव वाचून दाखवत असत आणि समजावूनही सांगत असत. . जोतिरावांना वाटे आपली पत्नी सावित्रीही शिकली पाहिजे; परंतु इंग्रजांनाही मुलींची शाळा काढण्यासाठी पुण्यात भरपूर प्रयत्न केले; पण पुण्यातील धर्ममार्तंड ब्राह्मणांनी मुलींच्या शाळा काढण्यास विरोध केला. त्यामुळे इंग्रजांनाही मुलीची शाळा काढणे शक्य झाले नाही. या कारणाने जोतिरावांची पंचाईत झाली. त्यांना सावित्रीला शिकवावयाचे होते.घरात तर पती-पत्नीलाही बोलायला मनाई होती. अशा परिस्थितीतही जोतिबांनी सावित्रीला शिकविण्याचा दृढनिश्चय केला आणि मार्ग काढला.

घरी सावित्रीला शिकविता येत नव्हते. म्हणून जोतिबांनी शेताची निवड केली. दररोज शाळा संपली की, जोतिबा मळ्यात जाऊ लागले आणि सावित्रीबाईला व मावस बहीण सगुणाबाई यांना जमिनीची पाटी करून काडीची पेन करून बाराखडी शिकवायला सुरुवात केली. झाडाची पाने तोडून एक, दोन मोजून उजळणी घेऊ लागले. जमिनीच्या पाटीवर शंभरापर्यंचे पाढे आणि संपूर्ण मराठी बाराखडी शिकविण्यात आली.

शब्दरचना, गणित, वनस्पती, प्राणी ओळख इत्यादी विषयाचे ज्ञान संपादन केल्यावर सावित्रीबाईला शिक्षणाची जिज्ञासा वाढली. या पद्धतीने ती खूप शिकली, पुस्तक वाचू लागली. बेरीज-वजाबाकी समजू लागली. परंतु यामुळे सावित्रीचे शिक्षण कीती झाले हे कसे ठरविणार? त्यासाठी मळा नव्हे तर एखादी शाळा हवी होती.

सगुणाबाई मि. जॉन नावाच्या मिशनयाच्या मुलांना सांभाळीत असत. त्यामुळे तिचा पुण्यातील इंग्रज महिलांशी संपर्क होता. मिसेस मिचेल यांनी पुण्यातील छबीलदास यांच्या वाड्यात एक नॉर्मल स्कूल चालवित होती. नॉर्मल स्कूल म्हणजे आजच्या अध्यापक विद्यालयासारखाच प्रकार होता. सगुणाबाईने जोतिबांना सांगून मिसेस मिचेलची भेट घेतली.

सावित्री आणि सगुणाबाईंना नॉर्मल स्कूलमध्ये प्रवेश देण्याची विनंती केली. जोतिबा दुसरे दिवशी सावित्री आणि सगुणाबाईंना घेऊन नॉर्मल स्कूलमध्ये गेले. मिसेस मिचलने त्या दोघींची परीक्षा घेतली. त्या दोघीही त्यांच्या परिक्षेत पास झाल्या. त्या दोघीनाही तिसऱ्या वर्गात प्रवेश मिळाला. त्या दोघी जिद्दीने अभ्यास करून अध्यापिकेची पदवी संपादन केल्या.

महात्मा ज्योतिबा फुले यांचे कार्य

जोतीने इंग्रजी शाळेतील शिक्षण सन १८४७ साली पूर्ण केले. शाळेत शिकत असताना जोतीनी जॉर्ज वॉशिंग्टन आणि मार्टिन ल्यूथर यांचे चरित्र वाचले होते. तसेच अमेरिकन स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास वाचण्यात आला होता. शिक्षण घेत असतानाच लहुजी वस्ताद यांच्याकडून तलवार, दांडपट्टा व निशाणेबाजीचे शिक्षण घेतले होते. वयाच्या विसाव्या वर्षी आपला देश, आपला समाज गुलामीतून मुक्त करण्याचा निर्धार केला.परंतु आपला समाज अडाणी असल्यामुळे त्यांना स्वातंत्र्य कसे कळणार? त्यासाठी त्यांना प्रथम शिक्षण देण्याची गरज आहे. ते काम आपण केले पाहिजे असे जोतीला वाटू लागले आणि शूद्र-अतिशूद्र वर्गात शिक्षणाचा प्रसार करून समाजातील जातिभेद नष्ट करत समतेवर आधारित नवा समाज निर्माण करण्याचे ध्येय जोतिबांनी निश्चित केले.

वैदिक (हिंदू) शास्त्राप्रमाणे शूद्र पुरुषाला व संपूर्ण स्त्रियांना शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता; परंतु इंग्रजांची सत्ता भारतात आल्यावर सन १८१३ मध्ये प्रत्येक नागरिकाला शिक्षण प्राप्त करून देण्याचा कायदा केला होता. या कायद्याची अंमलबजावणी करून शहरात मुलाच्या शाळा काढण्यात आल्या होत्या. परंतु पुण्यातील कर्मठ ब्राह्मणांनी मुलींची शाळा काढण्यास इंग्रजास विरोध करीत होते. ते काम करण्याची जोखीम जोतिरावांनी हाती घेतली. जोतिबांनी स्त्रियांच्या शिक्षणासाठी पुण्यात शाळा सुरू केली. ही बाब कर्मठ ब्राह्मणांना समजताच, त्यांनी जोतिबाचे वडील गोविंदराव यांना तुमचा जोतिबा धर्माच्या विरोधात शूद्र-अतिशूद्र, महार-मांगाच्या मुलींना शिक्षण देऊन धर्म बुडवित आहे, असे सांगितले.

त्या ब्राह्मणाचे ऐकून गोविंदरावांनी जोतिबाला शाळा बंद कर नाहीतर घरातून चालता हो असा आदेश दिला.जोतिबा आपल्या जन्मदात्यास म्हणाले, “मला मरण ओढवले तरी चालेल; पण मी हाती घेतलेले कार्य सोडणार नाही.” असे बाणेदार उत्तर दिले. जोतिबांनी आपली पत्नी सावित्रीला सोबत घेऊन स्वतःचे घर सोडले व स्वतःचा उद्योगधंदा करून संसार चालविले आणि गंजपेठेत मित्र सदाशिव गोवंडे यांच्या सहकार्याने प्रथम मुलींसाठी शाळा सुरू केली. हे कार्य धर्ममार्तंडाविरुद्ध जोतिबांने पेटविलेली क्रांतीची मशाल ठरली.

जोतिरावांचे हे शैक्षणिक कार्य क्रांतिकारक होते. हजारो वर्षे अज्ञानाच्या अंधकारात खितपत पडलेल्या समाजास ज्ञानाचा प्रकाश दाखविणारे जोतिराव हे पहिले भारतीय क्रांतिकारी महात्मा ठरले. तो बहुजनाच्या क्रांतीचा दिवस म्हणजे १ जानेवारी १८४८ हा होय. हाच खरा भारतीयांचा पहिला शिक्षण दिन होय.

सावित्रीबाई फुले भारतीय विद्येची देवता

सन १८४७ साली जोतिरावांनी सावित्रीचे अध्यापनाचे शिक्षण पूर्ण केले. जोतिराव आणि सावित्री एवढ्यावरच थांबलेले नाहीत. त्यांनी भारतातील समाज व्यवस्थेचा काळाकूट अंधार दूर सारून समाजाला अज्ञानाच्या अंधकारातून मुक्त करण्याचा निर्धार केला. हे एक पाखंडी धर्ममार्तंडाला आवाहन होते.

त्या काळात अहमदनगर येथे इंग्रज महिला मिस फॅरार हिने गोया लोकांच्या मुलींसाठी शाळा चालवित होती. तेथे जाऊन जोतिरावांनी शाळा कार्यप्रणालीचा अभ्यास केले आणि अशीच शाळा पुण्यात काढण्याचे ठरविले.

जोतिरावांनी पुण्यातील मित्र सदाशिवराव गोवंडे यांच्या सहकार्याने गंज पेठेतील जागेत मुलीची शाळा ०१ जानेवारी १८४८ रोजी सुरू केली. हा दिवस भारतातील लोकांसाठी शिक्षणाचा क्रांतिकारी दिवस ठरला.

या शाळेतील मुलींना शिक्षण शिकविण्याचा पहिला बहुमान सावित्रींना मिळाला. भारतीय स्त्रियांच्या समग्र क्रांतिपर्वाला सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी चार ब्राह्मण, एक मराठा, एक धनगर अशा सहा मुलींनी शाळेत प्रवेश घेतला.

पुण्यात जोतिरावांनी मुलींची शाळा काढली असून त्या शाळेची शिक्षिका सावित्री आहे, हे समजताच सनातनी ब्राह्मणांच्या तळपायाची आग मस्तकाला गेली आणि पुण्यात ओरड सुरू केली की, धर्माप्रमाणे स्त्रीला शिक्षणाचा अधिकार नाही, स्त्रियांना शिकविणे अधर्म आहे. स्त्रीने शिक्षण शिकणे म्हणजे पाप आहे. जात बुडेल, धर्म बुडेल आणि पृथ्वीवर पाप वाढून एक दिवस ही पृथ्वी बुडून जाईल आणि देव सर्वमानव जातीचा संहार करतील, अशी दहशत ब्राह्मणांनी पुण्यात सुरू केली होती. एवढ्यावरच न थांबता सावित्री शाळेला जाताना दगड, शेण मारा करू लागले. जीवे मारण्याची धमकी देऊ लागले. त्यावेळी जोतिरावाचे व्यायाम शाळेतील गुरू लहुजी वस्ताद व राणबा महार सावित्रीबाईच्या मदतीला धावून आले. त्यांनी सावित्रीला सुरक्षित शाळेत नेण्याचे व आणण्याचे कार्य सुरू केले.

एका वर्षात शाळेत २५ मुलींनी प्रवेश घेतला. त्यात ब्राह्मण – १०, मराठा-६, चांभार-२, महार-२, मांग-१, धनगर-१, कोष्टी-१, साळी१, माळी-१ अशा जातीच्या मुली शिक्षण घेत होत्या.

जोतिराव आणि सावित्री एवढ्यावरच न थांबता त्यांनी शिक्षणाचे कार्य पुढे नेटाने सुरू ठेवले. हजारो वर्षांच्या अज्ञानात खितपत पडलेल्या समाजाला एक शाळा कशी पुरी होणार? त्यांनी एका पाठोपाठ एक अशा अठरा शाळा सुरू केल्या. मुलांसाठीही त्यांनी शाळा काढली. अवघ्या चार वर्षांत पुण्यात सात शाळा सुरू झाल्या. पहिली भिडे वाड्यात, दुसरी महारवाड्यात, तिसरी चिपळूणकर वाड्यात, चौथी नाना पेठेत, पाचवी रास्ता पेठेत, सहावी वेताळ पेठेत, सातवी कसबा पेठेत. तसेच पुण्याच्या बाहेर हडपसर, ओतूर, सासवड, शिरवळ, तळेगाव, शिरूर, अंजीरवाडी, करंजे, भिंगार, मुंढवे या ठिकाणी शाळा सुरू केल्या.सावित्रीने आपल्या माहेरी सातारा जिल्ह्यात नायगाव येथेही शाळा सुरू केली. आपल्या जन्मभूमीत अज्ञानरूपी अंधारात ज्ञानाचा दिवा लावून सावित्रीने माहेरचे ऋण फेडले.

शाळांचा विस्तार वाढत गेला तसा सावित्रीचा कामाचा व्यापही वाढला. त्या सुरुवातीला शिक्षिका होत्या. नंतर मुख्याध्यापिका झाल्या. जोतिबा सावित्रीने सुरू केलेले कार्य सनातनी ब्राह्मणांना पहावले नाही. एक शूद्र माळ्याची बाई स्वतः शिकते आणि इतरांना शिकवते हे त्यांच्या वृत्तीला परवडणारे नव्हते. म्हणून त्यांनी पुन्हा गोविंदरावांना धर्माचा आसरा घेऊन आपल्याच मुलाच्या विरोधात तयार केले.

जोतिरावांना आपल्याच घरातून सन १८४९ साली बाहेर पडावे लागले. सावित्रीच्या सख्या भावानेही पत्र लिहून सावित्रीबाईंला शिक्षणाचे कार्य थांबविण्यास सांगितले. सावित्री आणि जोतिबांनी काम थांबवावे यासाठी चारही बाजूंनी प्रयत्न केले. पण निष्फळ ठरल्यावर ब्राह्मणांनी आडदांड माणसाला हाताशी धरून बेअब्रू करण्याची धमकी दिली. पण सावित्री डगमगल्या नाहीत.

शाळेत जाण्याच्या रस्त्यावर लहान मुलांकडून कधी मोठ्या माणसांकडून सावित्रीबाईंच्या अंगावर शेण फेकले जाई. दगड मारले जात. त्यावेळी त्या निमूटपणे पुढे जात. सावित्रीबाई शाळेत जाताना सोबत एक साडी घेऊन जात आणि शाळेत गेल्यावर शेणा-चिखलाने भरलेली साडी काढून दुसरी साडी नेसत. परंतु त्या आडदांड माणसाने अब्रूचा विषय काढताच त्या संतापल्या आणि पुढे होऊन त्या आडदांड माणसांच्या थोबाडात फाड फाड थापडा मारल्या. त्यामुळे त्या आडदांड माणसाची बोबडी वळली. एक खंबीर महिला म्हणून सावित्रीच्या नावाची सगळीकडे चर्चा झाली. त्यानंतर पुन्हा कोणी सावित्रीला बोलण्याची हिंमत केली नाही.

या सर्व संकटावर मात करून सावित्रीबाई खऱ्या अर्थाने भारतीय स्त्रियांसाठी विद्येची देवता ठरल्या.

सावित्रीबाई फुले यांचे शैक्षणिक कार्य

या देशात दोन हजार वर्षांपासून ९७ टक्के लोकांना शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता. शिक्षण घेण्याचा अधिकार फक्त ब्राह्मणांनाच होता. त्यांच्या स्त्रियांनाही शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता.त्यांच्या कर्मठ धर्माच्या दृष्टीकोनातून त्यांचीही स्त्री चुल आणि मूल यासाठी वापरण्याची वस्तू होती. तिला सन्मानाने जीवन जगण्याचा अधिकार नव्हता. अशा काळात आणि पेशवाईच्या पुण्यात फुले दांपत्यांनी शिक्षणाचे कार्य सुरू केले. परंतु इतिहासकारांनी सावित्रीबाईची ओळख अशी करून दिली की, ती महात्मा फुले यांच्या पत्नी आणि मुलीच्या शाळेची शिक्षिका म्हणूनच. परंतु सावित्रीबाईची योग्यता ही त्याहीपेक्षा खूप मोठी होती.

सावित्रीबाई शाळेत शिक्षिका म्हणूनच काम केले नाहीत, तर त्या आपल्या शैक्षणिक अनुभवावरून आणि निरीक्षणावरून अनेक शिक्षण शास्त्रविषयक निष्कर्ष काढून त्या अंमलात आणणाऱ्या शास्त्रज्ञ होत्या. मागासवर्गीय मुलांचा शैक्षणिक विकास करायचा असेल तर त्याच समाजातील शिक्षक पाहिजेत. म्हणून पुढे त्या पद्धतीने मागासवर्गातील शिक्षकास प्राधान्य दिले. कारण सावित्रीबाई आणि सहकारी फातिमा शेख यांचे शिकविणे उत्कृष्ट असूनही श्रीमंत व ब्राह्मण मुलीच्या शाळेची प्रगती अधिक आहे असे दिसून आले.

तेव्हा सावित्रीबाईंनी असा सिद्धांत मांडला की, ज्या समाजातून व ज्या परिस्थितीतून मुली, मुले येतात, त्याचा बरा वाईट परिणाम संबंधित मुला-मुलीच्या शिक्षणावर होत असतो. कारण उच्च वर्णातील शिक्षक हे शूद्र जातीतील मुलांना जवळ करणार नाहीत. आणि उच्च जातीतील मुलानाच जवळ करीत असतील तर त्यांचा परिणाम समाजातील मुलाच्या मनाचे खच्चीकरण करणारे ठरेल. म्हणून ज्या समाजाची मुलं त्याच समाजाचा शिक्षक असणे गरजेचे असते, हा मानवशास्त्रीय सिद्धांत सावित्रीनी मांडला. इ. स. १८५३ मध्य सावित्रीबाईंनी मांडलेला सिद्धांत आता सर्वमान्य झाला आहे.

आपल्या शाळेत शिक्षिका प्रशिक्षितच असले पाहिजे म्हणून फुले दांपत्यांनी एक नॉर्मल स्कूल काढले. माणसाला नुसते शिक्षण देऊन चालणार नाही तर त्यासाठी शिक्षणाबरोबर संस्कार आणि संगत यांची जोड पाहिजे. तरच माणसाला माणूसपण येऊ शकते, असा शिक्षण सिद्धांत फुले दांपत्यांनी मांडला आणि अंमलात आणला. म्हणून त्यांना शिक्षणतज्ज्ञही म्हणतात.

जोती-सावित्रीनी स्त्री व शूद्रांसाठी चालविलेल्या शाळेची संख्यात्मक आणि गुणात्मक वाढ होऊ लागली. १२ फेब्रुवारी १८५३ रोजी मुलांच्या शाळेची तपासणी झाली. पुणे महाविद्यालयातील सभामंडपात तीन हजार शिक्षणप्रेमी लोकांनी गर्दी केली होती. या कार्यक्रमाला ब्रिगेडियर ट्रायडेल व त्यांची पत्नी इ.सी. जोन्स, प्रोफेसर फ्रेजर, सरदार अण्णा साहेब ढमढेरे, प्रोफेसर छत्रे, प्रो. कृष्णशास्त्री चिपळूणकर, श्री. बापुराव भांडे आणि पुणे महाविद्यालयाचे प्रा. मेजर कँडी इत्यादी प्रतिष्ठित व विद्वान मंडळी या समारंभास हजर होती.

२१ मार्च १८५३ रोजी जोतिरावांनी स्थापन केलेल्या अतिशूद्राच्या शाळेची वार्षीक परीक्षा शुक्रवार पेठेतील पेशव्यांच्या तालीमखान्यात झाली. या समारंभास न्यायमूर्ती कीझ हजर होते.

जोतिरावांनी स्थापन केलेल्या शिक्षण संस्थेत तीन मुलींच्या शाळा होत्या.या शाळेतील मुलींची पटसंख्या २३७ होती. या मुलीच्या शाळेसाठी १६ डिसेंबर १८५३ ला राज्यपाल ना. व्हायकाऊंट फॉकलंड यांच्याकडे जमीन मिळावी म्हणून अर्ज केला होता. त्यानुसार शाळेच्या संस्थेस भोकरवाडी येथील सहा एकर तेहतीस गुंठे जमीन सन १८५७ मध्ये देण्यात आली.

जोती-सावित्रीचे शैक्षणिक कार्य पाहून इंग्रजांना जाग आली आणि अस्पृश्यांच्या शिक्षणविषयक धोरणात बदल केला. सन १८५४ साली ईस्ट इंडिया कंपनीने वूड नामक खलिता प्रस्तुत केला. या खलित्यानुसार येथून पुढे जातीच्या कारणास्तव कोणत्याही मुलीला सरकारी शाळेत अथवा महाविद्यालयात प्रवेश नाकारता येणार नाही, असे जाहीर करण्यात आले. त्यामुळे जोती-सावित्रीनी चालविलेल्या महार-मांगाच्या शैक्षणिक कार्यास कायद्याचे अधिष्ठान प्राप्त झाले.

यावरच न थांबता जोती-सावित्रीनी शेतकरी आणि त्यांच्या बायकांसाठी प्रौढांची रात्रीची शाळा सुरू केली. या शाळेत जोतीराव व सावित्रीबाई . रोज रात्री दोन तास मोफत शिकवित असत. या जोडप्यांनी अंधश्रद्धेचा अज्ञान, अंधकार हा ज्ञानाचा दिवा लावूनच नष्ट केला. त्यामुळे त्या संपूर्ण भारतीय समाजाच्या राष्ट्रपिता व आणि राष्ट्रमाता ठरल्या.

फुले दांपत्यावर मारेकरी पाठवले

जोतीराव व सावित्रीबाईचे कार्य सनातनी ब्राह्मणांना पाहवले नाही. ते सतत जोतिरावावर जळत होते.एकदा जोतीराव आणि सावित्रीबाई प्रौढांच्या रात्रशाळेत शिकवून घरी परत आले. जेवण करून ते दिवसभराच्या श्रमाने थकल्यामुळे झोपी गेले. परंतु जोतीरावांची झोप सावध होती. मध्यरात्रीच्या सुमारास माणसांच्या पावलाचा आवाज जोतीरावाच्या कानावर पडला. ते जागी होऊन उठून बसले. समईच्या अंधूक उजेडात त्यांना दोन व्यक्ती अस्पष्टपणे दिसले. त्यांनी समईची वात मोठी केली.

त्या उजेडात दोन व्यक्ती हातात सुरा घेऊन उभे टाकलेले दिसले आणि जोतीराव ओरडले, “कोण आहे रे तिकडे? तुम्हाला काय पाहिजे?” त्यावर रोडे रामोशी म्हणाला, “आम्ही तुम्हाला ठार मारावयास आलो आहोत.” धीटपणाने जोतीराव त्यांना विचारले, “मी तुमचा कोणता अपराध केला आहे. म्हणून तुम्ही आम्हाला ठार मारावयास आला आहात?” त्यावर धोंडिराम कुंभार म्हणाला की, “तुम्हाला ठार मारण्यासाठी आम्हाला प्रत्येकी हजार रुपये मिळणार आहेत.” त्यावर जोतीराव म्हणाले, “माझ्या मरणामुळे जर तुमचा फायदा होणार असेल तर त्या सुयाने माझा प्राण घ्या. माझ्या मरणाने जर दलितांचे हित होणार असेल तर मी माझे भाग्यच समजतो आणि मरण्यास मी तयार आहे.”

हे उदगार ऐकून मारेकऱ्यांचे डोळे पाणावले. ज्यांनी आपल्या उद्धारासाठी कार्य करीत आहेत त्यांनाच आपण मारत आहोत, याचा पश्चाताप त्यांना झाला आणि शस्त्र खाली टाकून जोतीरावांना शरण आले. आणि ते म्हणाले, “ज्यांनी तुमच्यासारख्या महात्म्याला मारावयास आम्हाला पाठविले, त्यांनाच आता जाऊन ठार मारतो.” त्यावर जोतीरावांनी त्यांना तसे न करण्याविषयी सांगून आपण सूडाची भावना ठेवू नये, असा उपदेश त्या दोघांना केला. त्यावेळपासून रामोशी रोडे आणि धोंडिराम कुंभार जोतीरावांचे निष्ठावान अनुयायी झाले. रोडे रामोशी जोतिरावांचा अंगरक्षक बनला. धोंडिराम कुंभार जोतीरावांनी स्थापन केलेल्या ‘सत्यशोधक समाजाचा प्रचारप्रमुख झाला. धोंडिराम कुंभाराने वेदाचार’ नावाचे पुस्तक लिहिले. तो पंडितराव धोंडिराम नामदेव या नावाने प्रसिद्ध आहे.

सावित्रीबाई फुले यांचा सत्कार

जोतीराव-सावित्रीमातेने सुरू केलेल्या शैक्षणिक कार्याची नोंद इंग्रज अधिकाऱ्यांनी घेतली होती. १६ नोव्हेंबर १८५२ साली पुण्यात विश्रामबागेजवळ फुले दांपत्याचा सत्कार करण्याचे ठरले होते. या सत्कार समारंभाला पुण्यातील विद्वान शास्त्री मंडळी, कलेक्टर, प्रोफेसर, ब्रिटिशांचे विविध खात्यातील अधिकारी या कार्यक्रमाला हजर झाले होते. मेजर कँडी यांच्या हस्ते सावित्रीमाता व जोतीरावांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

या सत्कार समारंभी कँडी साहेब म्हणाले, “मिशनरी पद्धतीने सावित्रीबाईंननी स्त्रियांची सेवा केली. विरोधकांचा विरोध सहन करून जिद्दीने कार्य चालू ठेवल्या. त्या मागे हटल्या नाहीत. त्यांच्या कार्याला भारतीय इतिहासात तोड नाही. सावित्रीबाईंनी स्त्री-शूद्रांची सेवा ईश्वर सेवा मानून केली. स्त्रियांसाठी शिक्षणाची दारे खुल्या करून दिल्या.” “

इंग्रज सरकारने हा वैभवशाली सत्कार घडवून आणला होता. हा कार्यक्रम अटोपून घरी आल्यावर जोतीराव सावित्रीबाईना म्हणाले, “खरं सांगू तुम्हाला, खरे पाहू गेल्यास तुमचेच अभिनंद करावयास पाहिजे होते. कारण मी शाळा स्थापण्यास कारणमात्र आहे. पण त्या शाळा तुम्ही अनेक संकटाला तोंड देऊन उभारल्या. अनेक दुःखे सोसून नावारूपास आणले, याचा मला खूप अभिमान वाटतो.”

अशाप्रकारे इंग्रज सरकारकडून सन्मान मिळविणाऱ्या भारतीय पहिल्या शिक्षिका सावित्रीबाई ठरल्या. त्यामुळे खऱ्या अर्थाने भारतीयांची विद्येची देवता म्हटले तर वावगे ठरणार नाही.

महिला सेवा मंडळाची स्थापना

सावित्रीमातेला स्त्री सुधारणेकडे ओढा लागला होता. त्यांनी जोतीरावांच्या मार्गदर्शनाखाली स्त्री सुधारण्यासाठी एक “महिला सेवा मंडळ” संस्था स्थापन केली. ही भारतातील महिलाविषयक कार्य करणारी ही पहिली संस्था होती. या संस्थेच्या अध्यक्ष पुण्याचे कलेक्टर मि. जोन्स यांच्या पत्नी मिससे इ.सी. जोन्स बाई होत्या. या संस्थेतर्फे पहिली तीळगुळाचा कार्यक्रम १४ जानेवारी १८५२ साली घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या पत्रिका पुढीलप्रमाणे काढून घरोघर पाठविण्यात आल्या.

पत्रिका :

|| ता.१४ -१-१८५२ रोजी पुणे कलेक्टर साहेबाच्या मिसेस जॉन्स यांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक तीळगूळ समारंभ होणार आहे.तरी सर्व स्त्रियांनी आपल्या लेकी, सुना घेऊन यावे. समारंभ सायंकाळी ५ वाजता आहे. कोणत्याही जातीच्या अथवा धर्माच्या बायका आल्या तरी त्या एकाच जाजमावर बसतील. जातिभेद व पक्षपात न करता सर्वांना सारखेच धरून हळदी कुंकू लावण्यात येईल आणि तीळगूळ वाटण्यात. येईल.’

सौ. सावित्रीबाई भ्रतार जोतीराव फुले
सेक्रेटरी, महिला सेवा मंडळ.

सावित्रीमातेला या कार्यक्रमात गं. भा. सगुणाबाई क्षीरसागर, सौ. सरस्वतीबाई भ्र. सदाशिव, रा. ब. लोखंडे, सौ. अक्कासाहेब गणेश जोशी, सौ. उमाबाई भ्र. सिद्धेश्वर शास्त्री, सौ. हणमंतीबाई अय्यावारू, सौ. सावित्रीबाई भ्र. अण्णा रोडे, सौ. राधाबाई भ्र. नारायणराव लोखंडे यांनी मदत केली. यावरून या कार्यक्रमास सर्व जातिधर्माच्या स्त्रिया उपस्थित होत्या हे सिद्ध होते.

बालहत्या प्रतिबंधक गृह व विधवाश्रमाची स्थापना

एकदा सावित्रीमाता शाळेतून घरी येताना एक दृश्य दिसलं. एका कचरा कुंडीत टाकून दिलेलं बाळाला कुत्रे फाडून खात होतं.हे दृश्य पाहून सावित्रीमातेचं हृदय हादरलं. त्यांना ते पाहवलं नाही. त्या घरी . आल्यावर तो प्रसंग जोतीरावांना सांगितल्या व डोळ्यात पाणी आणल्या.

जोतीराव त्यांना समजावत म्हणाले, “अहो, स्वतःला आवरा. तुमचं दुःख मी समजू शकतो. या समाजान स्त्रियाचा अतोनात छळ केला आहे. स्त्रियांना धडपणे जगूही देत नाहीत अन् मरूही देत नाहीत. नवरा मेला की, तिला नवऱ्याबरोबर सती दिलं जातं. आणि नवरा मेल्यानंतर जिवंत राहणाऱ्या विधवा स्त्रियांचे केस कापन विद्रूप केलं जातं. अशा स्त्रियांवर अत्याचार, बलात्कार केले जातात. अशा स्त्रियांना मुल झालं की, बालहत्या घडून येतात. हे थांबवण्याचं काम आपण करूया.”

असे बोलून जोतीराव उठले. लगेच लेखणी आणि कागद घेऊन बोर्ड तयार केला. “बालहत्या प्रतिबंधक गृह व विधवाश्रम” हा फलक आपल्या घरावर लावले. २८ जानेवारी १८५३ रोजी सावित्रीमाता आणि जोतीरावांनी पहिले बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले.

बाल हत्या करण्यापेक्षा आमच्या घरी ते मुल आणून द्या. आम्ही त्याला वाढवू असं सांगू लागले. समाजाकडून, नातलगाकडून फसवल्या गेलेल्या विधवा स्त्रियांनी आत्महत्या करू नये. त्यांनी आपलं माहेर समजून आमच्या घरात राहायला यावं. सुखरूप बाळांतपण करून घ्यावं. असा प्रचार सुरू केला. एवढ्यावरच न थांबता रात्रीला अशी घटना घडू नये म्हणून रात्री कंदील घेऊन गावात फिरू लागले. यावरून सावित्री राष्ट्रमाता आणि जोतीराव राष्ट्रपिता ठरले.

जोतीराव आणि सावित्रीमाता शिक्षणाचे कार्य सुरू करून थांबल्या नाहीत तर त्यांनी समाजातील अनिष्ठ रूढी, प्रथा, परंपरा दूर करण्यासाठी पर्यायही शोधत होते. समाजातील बालविधवा होणे, कुमारी माता होणे आणि आत्महत्या करणे ही स्थिती त्यांना अस्वस्थ करीत होती. त्यासाठी “बालहत्या प्रतिबंधक गृह आणि विधवाश्रमाची” निर्मिती केली होती. आणि तसा प्रचार करीत होते.

एकदा रात्रीच्या वेळी जोतीराव पुण्यातील लाकडी पुलावरून फिरायला जात असताना पुलाच्या कठड्यावरून नदीत कोणीतरी उडी घेण्याचा प्रयत्न करीत असलेले दिसले. त्यावेळी जोतीराव घाई घाईने त्या व्यक्तीस उडी मारण्यापासून रोखले व विचारपूस केली. ती एक विधवा स्त्री घरातील पुरुषाच्या वासनेची शिकार होऊन गरोदर होती आणि घरच्या जाचाला कंटाळून नदीत आत्महत्या करण्यासाठी आली होती. त्या विधवा स्त्रीची समजूत काढून तिला धीर दिला. ती स्त्री ब्राह्मण समाजातील बालविधवा काशीबाई होती. त्या काशीबाईला जोतीरावानी आपल्या घरी आणून सावित्री मातेच्या हवाली केले. सावित्रीमातेने काशीबाईची नीट काळजी घेऊन तिचे बाळांतपण केले आणि जन्मलेल्या बाळाची नाळ स्वतःच कापून १२ व्या दिवशी बारसे करून, त्या बाळाचे नाव यशवंत ठेवले.फुले दांपत्याला मुलबाळ नसल्यामुळे त्या काशीबाईच्या यशवंताला दत्तक घेऊन त्याला डॉक्टर बनविले. ,

न्हाव्यांचा संप घडवला

पेशवाईच्या काळात पुण्यात भयानक परिस्थिती होती. वैदिक धर्माच्या मनुस्मृतिची तंतोतंत पालन केले जात होते. शूद्र माणूस रस्त्याने चालला की कमरेला झाडू आणि गळ्यात मडके बांधून जावे लागत असे. बालविवाह होत असत. आणि तिचा नवरा मेला तर तिला सती देत. स्त्री विधवा झाली की तिच्या बांगड्या फोडीत, कुंकू पुसले जात, तिचे अंगावरील अलंकार काढून घेत, एवढ्यावरच न थांबता न्हाव्याला बोलावून त्याच्यापुढं बसवत व वस्तायाने संपूर्ण केस काढून विद्रूप बनवित. मगच त्या नवऱ्याची अंत्ययात्रा काढीत. पुढचे जीवन त्या स्त्रीला पशूपेक्षा हलाकीचे जगावे लागत. हे कुठेतरी थांबलेच पाहिजे असे सावित्री मातेला आणि हे जोतीरावांना वाटत होते.त्यांनी सर्व न्हावी समाजाला एकत्र बोलविले.

त्यांची सभा भरविली आणि त्या सभेत जोतीरावांनी केशवपनाबद्दल आपले विचार मांडले. सावित्रीमाता नामदेव न्हाव्याला उद्देशून म्हणाले, “सांगा बरं दादा, विधवाबाईचे केस कापण्याचा मोबदला तुम्हाला काय मिळतं?” नामदेव न्हावी म्हणाला, “त्या बदल्यात एक पैसा मिळतो.’ सावित्रीमाई सर्व न्हाव्यांना उद्देशून म्हणाल्या, “एका पैशासाठी तुम्ही किती वाईट काम करता याची तुम्हाला जाणीव आहे काय? आधीच बिचारीचा नवरा मेल्याचं दुःख भरपूर असत. त्यात तिच्या डोक्याला वस्तारा लावून चेहरा विद्रूप करता, त्या बिचारीला किती वाईट वाटत असेल याचा विचार केलाय का तुम्ही कधी? त्या विधवेच्या ठिकाणी तुमची भगिनी ठेवून बघा. या साऱ्या तुमच्याच भगिनी आहेत. भावानो, माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, हे काम तुम्ही बंद करा.”

सावित्रीबाई फुले यांचे हे विचार सर्व न्हाव्यांना पटले. त्या काळात दिनबंधू वृत्तपत्राचे संपादक नारायण मेघाजी लोखंडे कामगार संघटना चालवित होते. त्यांनी सर्व नाभिकांना संघटित केले. सर्व न्हाव्यांनी विधवा स्त्रियाचे केसाला वस्तारा न लावण्याची प्रतिज्ञा केली.अशा पद्धतीने न्हाव्यांचा संप घडवून आणण्यात सावित्रीमाता व जोतीराव यशस्वी झाले.

फुले यांनी वसतिगृह सुरू केले

जोतीराव आणि सावित्रीमातेनी शिक्षणाचे दारे खुली केली असली तरी गरिबी परिस्थितीमुळे शहरात येऊन शिक्षण घेणे शक्य नव्हते. अशा गोरगरिब मुला-मुलींसाठी आपल्या घरातच वसतिगृह सुरू केले. त्यांच्या लागणाऱ्या खर्चासाठी जोतीरावांनी खिश्चन मिशनच्या शाळेत अर्धवेळ नोकरी स्वीकारली. सावित्रीमाता तर बिनपगारीच काम करत होत्या. आपलं पोट जिथं नीट भरत नाही त्या ठिकाणी दुसऱ्याचा विचार करणं ही साधी गोष्ट नाही. त्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो. पहिल्यांदा दोनच मुले त्यांच्या वसतिगृहात राहू लागले. एक होता लक्ष्मण कराडी जाया मुंबईचा राहणारा आणि दुसरा होता महादू सहादू वाघोळे पुण्याजवळचा. हे दोघे दत्तकपुत्र यशवंत बरोबर मिळेल ती चटणी भाकरी खाऊन शिक्षण घेतले.

सावित्रीमाता आणि जोतीरावाबद्दल म्हणतात, “सावित्रीमाता आमच्या आईसारख्याच आमच्यावर माया करीत असत. त्यांच्यासारखी दयाळू व प्रेमळ अंतःकरणाची स्त्री अजूनसुद्धा कुठे पाहिली नाही. स्वतःच्या आईपेक्षाही जास्त प्रेम करणारी ही माऊली आहे. सावित्रीमातेची राहणी अत्यंत साधी असून सावित्रीमाता व जोतीराव हे दोघे एकमेकांशी अत्यंत आदराने व प्रेमाने वागत. या दोघानाही स्त्री जातीची आणि शूद्राची उन्नती व्हावी म्हणून तळमळ होती. त्यांच्या चेहऱ्यावर राग कधी दिसायचाच नाही. त्या हसायच्या मात्र गालावर हसू दिसेल एवढेच मर्यादित.” अशा स्वभावाची सावित्रीमाता गोरगरिब मुलांच्या माऊली व त्यांच्यासाठी शीतल सावली होत्या.

अस्पृश्यांसाठी पाण्याचा हौद खुला केला

सन १८५४ साली आऊ सगुणाबाईचे निधन झाले. सन १८६८ साली जोतीरावांचे वडील गोविंदराव फुले यांचेही निधन झाले. त्यामुळे जोतीरावांना आता स्वतःच्या घरी जावे लागले. दुःखद अंतःकरणाने जोतीराव सावित्रीमातेला म्हणाले, “प्रत्येक माणूस मरण्यासाठीच जन्माला येतो, याची मला जाणीव आहे; पण या समाजानं आमची बापलेकांची ताटातूट केली. वडिलांच्या उतारवयात मला त्यांची सेवा करता आली नाही, याचं दुःख वाटतं.”

जोतीराव आणि सावित्रीमाता सर्व दुःख आवरून कंबर कसून हाती घेतलेल्या सामाजिक कार्याला लागले. सन १८६८ ला पाण्याचा दुष्काळ पडला होता. पाण्यासाठी लोकांना वणवण फिरावं लागत होतं. सनातनी लोक नगरपालिकेच्या सार्वजनिक हौदाचे पाणी घेऊन जात होते. परंतु ज्या अस्पृश्यांना कमरेला झाडू आणि गळ्यात मडकं घालून रस्त्याने जावे लागत होते,त्यांना पाणी कोण घेऊ देणार? बिचारे उन्हाळ्याच्या कडकडीत पाण्यासाठी रानोमाळ भटकत होते.

कुणी नदीच्या पात्रात वाळूत खड्डे खोदीत होते आणि त्यातून घोटभर येणारे पाणी मडक्यात भरीत होते. कुठेच पाणी मिळत नसेल तर एखाद्या नाल्यातील घाणेरडे पाणी पिऊन तहान भागवत होते. हा प्रकार जोतीराव आणि सावित्रीमातेच्या नजरेतून सुटला नाही. त्यांनी अस्पृश्यांना पिण्यासाठी पाणी द्यावं म्हणून समाजापुढे प्रश्न मांडले; परंतु सनातनी लोक या गोष्टीला तयार झाले नाहीत. या उपर जोतीरावांना सावित्रीमाता म्हणाल्या, सनातनी लोकांना पाझर फुटणे शक्य नाही. त्यांच्या नादाला लागण्यापेक्षा आपण आपल्या वाड्यातील पाण्याचा हौद यांच्यासाठी खुला करूया.

जोतीरावांनी हा निर्णय अंमलात आणला आणि एकेका अस्पृश्यांच्या हाताला धरून पाण्याच्या हौदाकडे आणायचे व त्या पाण्यात त्याच्याच हाताने मडके बुडवून पाणी देऊ लागले. त्यांनी सर्व अस्पृश्यांसाठी स्वतःच्या वाड्यातील पिण्याच्या पाण्याचे हौद खुले करून दिले. ही गोष्ट सनातनी ब्राह्मणाला समजली आणि त्याच्या पोटात पोटशूळ उठले. त्यांनी खूप आगपाखड केली; परंतु फुले दांपत्य डगमगले नाहीत हे जोडपे खऱ्या अर्थाने भारतीय शूद्राचे राष्ट्रपिता व राष्ट्रमाता ठरले.

विधवा विवाह महिला संघाची स्थापना

भारतात वैदिक धर्माप्रमाणे पुनर्विवाह पद्धती नव्हती. जर एखाद्या स्त्रीचा नवरा मेला तर त्या स्त्रीला सती जावे लागत असे किंवा जन्मभर पांढरे कपडे घालून विद्रूप शरीराने जगावे लागत असे. त्या स्त्रीला दुसरे लग्न करण्याचा अधिकार नव्हता. या विधवा स्त्रीला कोणत्याही शुभकार्यात सहभागी होता येत नव्हते. विधवा स्त्रीला अशुभ मानले जात होते. तिच्या दुःखाची जाणीव कुणालाच नव्हती, तिच्या मनाची कुणी विचारच करीत नसत. त्या स्त्रीला चार भींतीच्या आतच जीवन काढावं लागत असे. तिला पांढया पायाची म्हणून दोष देत असत. तरुण विधवांवर घरातल्या एखाद्या लंपट पुरुषानी बलात्कार केला तर निमूटपणे सहन करावे लागत असे. जर स्त्री गरोदर राहिली तर घराच्या जाचाला कंटाळून तिच्यापुढे आत्महत्याशिवाय पर्याय उरत नव्हता. असे प्रमाण सर्वात जास्त ब्राह्मण समाजातील स्त्रियांचेच घडत असत.

अशा विधवांचे हे अंधारमय जीवन सावित्रीमाता जवळून पाहत होत्या. या विधवांना त्यांच्या अंधकारमय जीवनातून बाहेर काढण्याचा त्या विचार करू लागल्या. तरुणपणी विधवा झालेल्या स्त्रियांनी पुनर्विवाह करून सुखांचा संसार करावा असे सावित्रीमातेला वाटू लागले; परंतु या वाईट रूढी, परंपरा विरुद्ध लोकांना तयार करावे लागणार होते. ते करण्याचे धाडस सावित्रीमातेने जोतीरावांच्या सहकार्याने करून दाखविले.

जोतीराव आणि सावित्रीबाई यांनी विधवा स्त्रियांसाठी “विधवा विवाह महिला संघ” स्थापन केला. भारतातील आधुनिक काळातील पहिलीच संघटना असावी. विधवांवर होणाऱ्या जुलूमाविरुद्ध जोतीराव आणि सावित्रीमातेने चळवळ सुरू केली. विधवांची जुलमी अत्याचारातून सुटका करण्याचा एकच मार्ग होता तो म्हणजे विधवा स्त्रीचा पुनर्विवाह करणे होय. या फुले दांपत्यांनी या चळवळीचे नेतृत्व केले आणि इ. स. १८६४ साली एका अठरा वर्षे वयाच्या विधवेचं लग्न एका शेणवी जातीच्या विधुराबरोबर लावून पुनर्विवाह करण्याची पद्धत सुरू केली.

जर एखाद्या स्त्रीने पुनर्विवाह करीत नसेल तर तिने सन्मानाने जीवन जगण्यासाठी पती निधनानंतरही कुंकू लावावे, चांगले वस्त्र नेसावे आणि प्रत्येक कार्यक्रमात सहभागी व्हावे असे विचार सावित्रीमाता मांडू लागल्या. सावित्रीमातेने एका ब्राह्मण विधवा स्त्री काशीबाईचे बाळांतपण केले. त्या मुलाचे बारशे केले आणि त्या बाळाला दत्तक घेतले. विधवा काशीबाईला कुंकू लावण्यास व चांगले कपडे वापरण्यास दिले. सावित्रीमाता ही सर्व भारतीय स्त्रियांची पहिली शिक्षिकाच नाहीतर राष्ट्रमाता ठरली.

सार्वजनिक सत्यधर्माची स्थापना

जोतीराव आणि सावित्रीमातेला तत्कालीन समाजातील विषमता आणि सर्वसामान्यांची होणारी पिळवणूक त्यांना अस्वस्थ करीत होती. जोतीरावांना विद्यार्थी जीवनात ब्राह्मण मित्राच्या लग्नात श्रेष्ठ-कनिष्ठ नावावरून अपमानित व्हावे लागले होते. त्यांना मित्राच्या वरातीतून बाहेर हाकलण्यात आलं होते. असे अपमानित जीवन सर्व शूद्र-अतिशूद्र (मागासवर्गीय समाज) समाजाला जगावे लागत होते. त्यांना या वाईट रूढी व परंपरेतून बाहेर काढायचे असेल आणि खरा धर्म शिकवायचे असेल तर आपण त्यांना पर्याय निर्माण करून द्यावे लागेल तरच हे लोक जुन्या वाईट परंपरा सोडून नवीन पर्यायाकडे वळतील असे जोतीरावांचे ठाम मत झाले.

जोतीरावांनी २४ सप्टेबर १८७३ रोजी आपल्या सहकार्याना पुण्यात बोलावून घेतले आणि आपला संस्था निर्मितीचा उद्देश सांगितले. त्यावर जोतीरावांच्या म्हणण्याला होकार दिला आणि “सत्यशोधक समाज” नावाची संस्था भारतीय शूद्राच्या उन्नतीसाठी निर्माण झाली. आणि या सत्यशोधक समाज संस्थेमार्फत भारतीय इतिहासच सत्यशोधन करून मानव कल्याणासाठी सिद्धार्थ गौतमांनी सांगितलेला आणि अशोकानी प्रचार केलेल्या “सत्यधर्माची” निर्मिती केली.

ही संस्था वैदिक धर्माच्या कचाट्यातून शूद्रांना बाहेर पडण्यासाठी पर्याय दिला होता. सम्राट अशोकांनी दोन हजार वर्षांपूर्वी वैदिक धर्माला पर्याय सत्यधर्म दिला आणि वैदिक धर्म संपुष्टात आणला. परंतु पुष्यमित्र शुंग या ब्राह्मणाने पुन्हा वैदिक धर्माच्या पुनर्जिवन करून सत्यधर्म संपुष्टात आणून भारतीयांना शूद्र-गुलाम बनविले होते. त्यानंतर पहिल्यांदा शूद्राच्या मुक्तीसाठी जोतीराव फुलेंनी सत्यशोधक समाज संस्थेची निर्मिती करून सर्वांना ‘सत्यधर्म’ शिकविले.

सत्यशोधक समाज संस्थेने भटजींना न बोलावता सीताराम जबाजी अल्हाट आणि राधाबाई ग्यानोबा निंबणकर याचे भटाशिवाय सत्यशोधक पद्धतीने लग्न घडवून आणले. हे पुण्यातील सनातनी ब्राह्मण मंडळींना समजताच आगपाखड झाली. त्या ब्राह्मणांनी त्या मुलीची आई बजूबाईंवर दडपण आणले; परंतु सावित्रीमाता बजूबाईच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना धीर दिला. हे लग्न २५ डिसेंबर १८७३ रोजी सत्यशोधक पद्धतीने पार पडले.

जोतीराव आणि सावित्रीबाई यांनी यशवंत मुलाला दत्तक घेऊन त्याला डॉक्टर बनविले होते. ४ फेब्रुवारी १८८९ साली यशवंत आणि राधाबाई यांचा आंतरजातीय विवाह घडवून आणला. सावित्रीमातेने सून राधाबाईचे नाव बदलून लक्ष्मीबाई ठेवले. पुढे महात्मा जोतीरावांना पक्षाघाताचा झटका आला. सन २८ नोव्हेंबर १८९० रोजी महात्मा जोतीराव फुले यांचं निधन झालं. यापुढे जोतीराव आणि सावित्रीमातेने प्रत्येक कार्यक्रमात सत्यशोधक पद्धतीनेच कार्यक्रम करून सत्यधर्माचा प्रचार करू लागले.

जोतीरावांच्या मृत्युनंतर सन १८९३ मध्ये सासवड येथील सत्यशोधक परिषदेचे अध्यक्षस्थान सावित्रीमातेने भूषविले. सावित्रीमातेने गावोगावी सत्यशोधक समाजाच्या शाखा उघडण्याचा सपाटा लावला. त्यामुळे लोक भटाच्या तावडीतून बाहेर पडू लागले आणि त्यांची पिळवणूक बंद झाली. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारली.

फुले दांपत्याचा सत्कार

सावित्रीबाई आणि जोतीराव फुलेंनी अहोरात्र मेहनत करून “सत्यशोधक” चळवळीचे मोलाचे कार्य केले. सावित्रीमातेला सर्वजण ‘काकू’ म्हणत आणि जोतीरावांना ‘तात्या’ म्हणत. या दोघांची साधी राहणी आणि उच्च विचारसरणी होती. त्यांनी जनावराच्या पलीकडे जीवन जगणाऱ्या माणसाला माणूसपण शिकविलं होतं. हे सर्व करीत असताना सनातनी ब्राह्मणाचा छळ सोसला होता. जोतीरावांना बालपणापासूनच सनातन्याच्या छळाच्या वेदना सहन करण्याची सवय झाली होती. परंतु त्यांनी मागे परतून पाहिले नाहीत. त्या सर्व संकटाला तोंड देत आपलं कार्य चालूच ठेवले. सावित्रीमाताची तर साधी राहणी होती. तिने कधीच अंगावर दागिने घातले नाहीत. त्यांच्या गळ्यात काळ्या मण्याची पोत व त्यात सोन्याचे मंगळसूत्र होते. सावित्रीमाता भल्या पहाटे उठत असत आणि अंगणात सडा टाकून, स्नान करून कामाला लागत. त्या स्वच्छताप्रिय होत्या.

या फुले दांपत्यानी शूद्र-अतिशूद्रांना शिक्षणाची दारे खुली केली. अस्पृश्यांना पिण्याच्या पाण्याचा हौद खुला केला. बालहत्या प्रतिबंधक गृह व विधवाश्रम काढले. न्हाव्याचा संप घडविला. विधवा स्त्रियांचे पुनर्विवाह लावून दिले. बिगर ब्राह्मणाचा लग्नविधी करण्याची पद्धत सुरू केली.

मुलांच्या शिक्षणासाठी वसतिगृह सुरू केले. त्यांच्या पाट्या पुस्तकांसाठी ग्रंथालय सुरू केले. आंतरजातीय विवाह घडवून आणले. जोतीराव फुले आणि सावित्रीमाता यांचे कार्य पाहून सत्यशोधक कार्यकर्त्यांनी या महान जोडप्याचा सन्मान करण्याचे ठरविले. त्यानुसार ११ मे १८८८ रोजी मुंबई येथील मांडवी भागातील कोळीवाडा सभागृहात भव्य कार्यक्रम घडवून आणला आणि फुले दांपत्याचा सत्कार केला. टाळ्यांच्या गजरात जोतीरावांना बहुमानाची “महात्मा” ही पदवी अर्पण केली.

सार्वजनिक सत्यधर्म ग्रंथ लिहिला : सावित्रीमाता व महात्मा जोतीराव फुलेंनी आता पूर्वजांनी सांगितलेला परंतु सनातनी लोकामुळे लोप पावलेला “सत्य धर्म” लोकांना सांगितला. फुले दांपत्यांनी जीवनभर मेहनत घेऊन प्रत्यक्ष कृतीतून सर्वसामान्य माणसाला समजेल अशा पद्धतीने विषमतेच्या वैयक्तिक वैदिक धर्माला पर्याय म्हणून सार्वजनिक सत्यधर्माचे पुनर्जिवन केले आणि सत्यशोधक समाज संस्थेमार्फत प्रसार-प्रचार केला. हा “सत्यधर्म” शूद्र- अतिशूद्रांसाठी वरदान ठरला.

महात्मा फुले अपंग झाले होते. तरीही त्यांची लेखणी बंद पडू दिली नाही. त्यांनी “सत्यधर्म” प्रसार-प्रचार करीत असले तरी ते सूत्र ग्रंथात रुपांतर करावयाचे राहून गेले होते. महात्मा फुले अंथरुणात पडून होते तरी ‘सत्यधर्म’ ग्रंथ लिखाणाचे काम हाती घेतले. त्यांचा उजवा हात लुळा असल्यामुळे त्यांनी डाव्या हाताने लिहून ‘सार्वजनिक सत्यधर्म’ ग्रंथ डिसेंबर १८८८ साली पूर्ण केला.

धैर्यवान सावित्रीबाई फुले

महात्मा जोतीराव फुले अंथरुणात पडलेले होते. त्यांचा मुलगा यशवंत मोठा झाला होता आणि त्याचे शिक्षण चालू होते. परंतु महात्मा फुलेंना यशवंतच्या लग्नाची काळजी लागली होती. कारण तो एका ब्राह्मण विधवेचा मुलगा होता. त्याला कोण मुलगी देणार, ही चिंता लागून , राहिली होती. बऱ्याच खिश्चन मुली सांगून आल्या; परंतु यशवंताने त्यांना नकार दिला. सावित्रीमातेने आपल्या पाहुण्यातील मुलगी पाहिली आणि त्या मुलीला यशवंतने पसंत केले. ही मुलगी हडपसर येथील ग्यानबा कृष्णराव ससाणे यांच्या (माळी) कुटुंबातील होती.ही गोष्ट ( सनातन्यांच्या कानावर गेली आणि त्यांनी ससाणेच्या नातेवाईकांकडे तक्रार केली. त्यामुळे समाज या लग्नाला मान्यता देण्यास तयार होईना, ग्यानबा ससाणे हे महात्मा फुलेंना मानणारे होते. सावित्रीमातेने सर्व समाजाला समजावलं आणि ४ फेब्रुवारी १८८९ रोजी ग्यानबा ससाणेंची मुलगी राधा आणि यशवंतचे लग्न ‘सत्यशोधक पद्धतीने’ लावलं.

सावित्रीमातेवर संकटावर संकटे आली तरी त्यांनी न घाबरता त्या सर्व संकटाला तोंड दिली. महात्मा जोतीरावांना पक्षाघाताचा झटका आलेला. त्या पाठोपाठ घरात कमावता कोणी नसल्यामुळे आर्थिक मंदी आली. समाजकार्यामध्ये तर वाढ झाली होती. ‘बालहत्या प्रतिबंधक गृह, शाळा, वसतिगृह,विधवाश्रम आणि सत्यशोधक समाज कार्यासाठी पैसा लागत होताच. या सर्व संकटावर मात करून कोंड्याचा मांडा खाऊन सावित्री मातेनं कार्यात कधीही खंड पडू दिला नाही. अशा परिस्थितीत महात्मा जोतीराव फुले २८ नोव्हेंबर १८९० साली गुरूवारी रात्रीचे २ वाजून २० मिनिटाला जग सोडून गेले आणि सावित्रीमातेवर दुःखाचा डोंगर कोसळला होता.

वैदिक (हिंदू) धर्मपद्धती प्रमाणे प्रेतयात्रेसमोर जो मडके धरतो तोच ) मृताचा वारसदार ठरतो असं म्हणतात. हे मडके धरण्याचा हक्क दत्तकपुत्र यशवंतच असताना त्याला विरोध करून पुतण्या मडकं धरण्यास पुढे आला आणि त्या दोघांत भांडणे लागली. त्या वेळेस सर्व दुःख आवरून सावित्रीमाता धैर्याने पुढे आली आणि म्हणाली, “बाबानों, माझे सेठजी गेले आणि तुम्ही वारसा हक्कावरून भांडता, दोघेही व्हा बाजूला मीच धरते मडके.” लगचे सावित्रीमातेने मडके हातात घेतले आणि स्वतःच्या हाताने पती महात्मा जोतीराव फुले यांना अग्नि दिला.

जोतीराव गेले आणि सावित्रीमाता पोरक्या झाल्या. तरीही पण हिंमत न हरता जोतिबांचे अपूर्ण राहिलेले कार्य पूर्ण करण्यासाठी ताठ मानेने कामाला लागले. या पडत्या काळात मामा परमानंद आणि रामचंद्र धामणकर यांनी आर्थिक मदत करण्याचे काम सुरू ठेवले.या काळात १० फेब्रुवारी १८९२ साली सयाजीराव गायकवाड महाराजांकडून एक हजार रुपयांची मदत मिळाली. सावित्रीमातेने ही रक्कम तुकाराम तात्या पडवळ यांच्या कपनीत रामचंद्र धामणकरामार्फत गुंतविली. त्याचे व्याज तीन महिन्याला फक्त पन्नास रुपये मिळत. त्या पैशातूनच सावित्रीमाता आपला गाडा चालवायच्या.

पुढे मुलगा यशवंत डॉक्टर झाल्यावर मिलिट्रीमध्ये नोकरीला लागला. एका धक्यातून सावित्रीमाता सावरतात न सावरताच तोच दुसरा धक्का सावित्रीमातेला बसला. मुलगा डॉ. यशवंतरावाची पत्नी राधाबाई ६ मार्च १८९५ रोजी वारली. कर्तीधर्ती तरुण सून डोळ्यासमोरून निघून गेली आणि उतारवयात मोठा धक्का बसला. पुढे डॉक्टर यशवंत नोकरीच्या निमित्ताने परदेशात गेला. सावित्रीमाता उतारवयात एकाकी, एकट्या उरल्या. तरीही सावित्रीमातोने धीर न सोडता धैर्याने पुढील कार्य सुरूच ठेवल्या.

सावित्रीबाई फुले यांचे शेवटचे दिवस

सावित्रीमातेचं वय झालेलं तरी पण त्यांचं सत्यशोधक चळवळीचं कार्य चालू होतं. त्या शरीराने थकलेल्या असल्या तरी मनाने थकलेल्या नव्हत्या. लोककल्याणासाठी, लोकांना जागृत करून त्यांच्यातील अज्ञान, अंधश्रद्धा दूर करणार नाही तोपर्यंत समाजात परिवर्तन घडवून येणार नाही, हे सावित्रीमाता जाणत होती. म्हणून त्या कोणतेही संकट आले तरी त्या न डगमगता त्या संकटाला तोंड देत असत. हा क्रम त्याचा चालू असताना, निसर्गाचा कोप झाला.

निसर्गाचा कोप म्हणजे मग तो भूकंप, चक्रीवादळ, अतिवृष्टी किंवा भयंकर रोगाची साथ असो या शक्तीपुढे माणूस हतबल होतात. आणि निसर्ग कोपाचे बळी पडत असतात.

त्याकाळी विज्ञानाची प्रगती झालेली नव्हती. भारतात तर शिक्षणाच्या अभावापायी दवाखानेही नव्हती. माणूस अज्ञान, अंधश्रद्धा, वाईट रूढी परंपरेत जगत होता आणि मरतही होता. याचाच परिणाम म्हणून नारू, देवी, कॉलरा, विषमज्वर, कावीळ, प्लेग यासारखे साथीचे रोग व्हायचे आणि अनेक लोक एका पाठोपाठ एक असे प्रत्येक घरातील चार पाच लोक मरायचे. हे रोग संसर्गजन्य असल्यामुळे रोगी माणसांची सेवा करण्यास निष्काळजीपणा झाला की तोही दगावयाचा. म्हणून त्या काळात जन्म मृत्युचे प्रमाण जवळ जवळ सारखेच असायचे.

सावित्रीमाता दुष्काळाचा सामना करून बाहेर पडतात न पडतात तोच दुसरा निसर्ग कोप सुरू झाला. सन १८९७ साली उंदरं पटापट मरू लागली आणि प्लेग नावाच्या साथीचा रोग सुरू झाला. पुण्यामध्ये प्लेगने थैमान घातले. पुणे परिसरात शेकडो माणसं मृत्युमुखी पडू लागली. या आकस्मिक प्रकारामुळे इंग्रज सरकारही गोंधळून गेले. हा रोग एकापासून दुसऱ्याकडे जातो. सुरुवातीला हा रोग हाँगकाँग बंदरापासून सुरू झाला.

दळणवळणाच्या माध्यमातून हा रोग मुंबईला आला. तेथून हा प्लेगचा रोग पुण्यात आला होता.त्यामुळे इंग्रज सरकारने दळणवळणावर प्रथम बंदी घातली. रोग्याचा शोध घेण्यासाठी सैनिकांना पाचारण केले. इंग्रज सैनिक रोग्यांचा शोध घेत गावोगावी हिंडू लागले. ते सैनिक घर स्वच्छतेच्या नावाखाली लोकांना मानसिक त्रास देऊ लागले. शारीरिक छळ करू लागले. घरात रोगी दिसला की त्याला ओढतच घराबाहेर आणून रुग्णवाहिकेत टाकू लागले आणि जनावराप्रमाणे जंगलात, शिवारात फेकून देऊ लागले. त्यामुळे लोकांनी इंग्रज सैनिकांची धास्तीच घेतली होती.

सावित्रीमातेला हे दृश्य पाहवले नाही. त्यांनी सत्यशोधक समाजाची बैठक घेऊन या रोगाला तोंड देण्यासाठी “प्लेग निवारण महिला कमिटी” नेमली आणि या सैनिकाची अरेरावी थांबविण्यासाठी सावित्रीमाता तडक जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. मातेने जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन सैनिकांनी लोकांचा छळ केल्याची तक्रार नोंदवून हा प्रकार थांबविण्या सांगितले.

सावित्रीमातेने “प्लेग निवारण महिला कमिटी”च्या मार्फत आपल्या जीवाभावाच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन लोकांना मदत करण्यास सुरू केले. त्यावेळी सावित्रीमातेचा मुलगा यशवंत हा डॉक्टरची पदवी घेऊन अहमदनगर येथे नोकरी करत होता. त्याला पुणे येथे बोलावून घेतले आणि वानवडी येथे ससाण्याच्या माळावर आपला खाजगी दवाखाना उघडला. डॉ. यशवंतरावांनी आईने हाती घेतलेल्या मानवसेवेच्या कार्यास हातभार लावण्याचे कार्य सुरू केले. सत्यशोधक समाज संघटनेचे कार्यकर्ते आजारी माणसाला उचलून दवाखान्यात नेत होते. त्यावर डॉ. यशवंत उपचार करीत होते. या काळात सावित्रीमाता पायात भिंगरी बांधल्यासारख्या फिरत असत. या वयातही प्रचंड धावपळ करून लोकसेवा करीत होते.त्या मानव सेवा हिच ईश्वर सेवा म्हणून मानव सेवेला वाहून घेतल्या होत्या.

सावित्रीबाई फुले यांचा मृत्यू

पुण्याजवळ मुंढवे नावाचं खेडं होतं. तेथे मागासवर्गीयांची वस्ती होती. तेथे प्लेग रोगाने थैमान घातलेला होता.सावित्रीमातेला ही गोष्ट समजली. ताबडतोब त्या वस्तीत गेल्या. पांडुरंग बाबाजी गायकवाड नावाचा मुलगा तापानं फणफणत होता. त्याला चालणंही शक्य नव्हत आणि वाहनही नव्हती. त्याच्यावर ताबडतोब इलाज करणे गरजेचे होते. त्योवळी सावित्रीमातेनं क्षणाचाही विलंब न करता वयाच्या सहासष्टाव्या वर्षी त्या मुलाला स्वतःच्या पाठीवर टाकून डॉ. यशवंतरावांच्या दवाखान्यात आणले. त्या मुलाची प्लेगची लागण सावित्रीमातेला झाली होती. त्याच्या काखेत भली मोठी गाठ आली. अंगात ताप वाढला. डॉक्टर मुलानी खूप प्रयत्न केले; परंतु ते प्रयत्न व्यर्थ गेले. सावित्रीबाई फुले यांचा मृत्यू १० मार्च १८९७ रोजी प्लेगच्या साथीने झाला आणि एकच अक्रोश झाला. सामान्य माणसांसाठी, राष्ट्रासाठी काम करणारी राष्ट्रमाता सर्वांना सोडून गेली.

सावित्रीबाई फुले यांची माहिती – जीवन आणि कार्य

सावित्रीबाई ज्योतीराव फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी नायगाव येथे पुण्यापासून 50 कि.मी. अंतरावर झाला. ती आई लक्ष्मी आणि वडील खंडोजी नेवेशे पाटील यांची मोठी कन्या होती. 1840 मध्ये, वयाच्या 10 व्या वर्षी, तिचे लग्न ज्योतिरावशी झाले होते, त्यावेळी त्यावेळी ते 13 वर्षांचे होते. लग्नानंतर सावित्रीबाई आणि जोतिबा पुण्यात दलित-कामगार वर्गात राहत असत.

ज्योतिराव यांनी आपल्या पत्नीला घरीच शिक्षण दिले आणि शिक्षक बनण्याचे प्रशिक्षण दिले. सावित्रीबाईंच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी ज्योतिरावांचे मित्र सखाराम यशवंत परांजपे आणि केशव शिवराम भावलकर (जोशी) यांनी घेतली. सावित्रीबाई यांनी अहमदनगरमधील सुश्री फरार संस्थेत आणि पुण्याच्या नॉर्मल स्कूल ऑफ मिसेस मिशेल येथेही शिक्षकांचे प्रशिक्षण घेतले होते.

सावित्रीबाई भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका आणि मुख्याध्यापिका झाल्या. तिचा संघर्ष आणि कथा ही आधुनिक भारतीय महिलांच्या भारतातल्या सार्वजनिक जीवनाची सुरूवात दर्शविणारी आहे.

पुरुष आणि स्त्रियांमधील समानतेसाठी आणि जातीव्यवस्थेच्या विरोधात लढा उभारण्यासाठी तीव्र संघर्षात व्यस्त होते. त्यांनी आपले जीवन शिक्षण आणि ज्ञान प्रसारित करण्यासाठी समर्पित केले. त्यांनी मुलींसाठी देशातील पहिले शाळा आणि ‘नेटिव्ह लायब्ररी’ सुरू केली.

1863 मध्ये त्यांनी गर्भवती व शोषित विधवांच्या सुरक्षिततेसाठी त्यांच्याच घरात ‘बालहत्या रोखण्यासाठी घर’ सुरू केले. हुंड्याशिवाय किंवा जास्त खर्च न करता लग्नाची प्रथा सुरू करुन त्यांनी सत्यशोधक समाज (सत्य सत्य शोधणारी संस्था) स्थापन केली. ते बालविवाहाच्या विरोधात होते आणि विधवा पुनर्विवाहांना समर्थन देतात. त्यांना स्वतःची मुले नव्हती, परंतु त्यांनी ब्राह्मण विधवा मुलाचे शिक्षण घेतले आणि त्याला आंतरजातीय विवाहाची व्यवस्था केली.

सावित्रीबाई आणि जोतिबा यांनी देशातील शूद्र आणि अतिसूद्र महिलांसाठी क्रांतिकारक सामाजिक शिक्षण चळवळ उभी केली. 1848 मध्ये शाळा सुरू केल्यावर आणि सावित्रीबाई फुले यांचे प्रशिक्षण घेतल्यानंतर जोतिबाने महार आणि मंगांसाठी एक शाळा सुरू केली. परंतु सहा महिन्यांतच त्याच्या वडिलांनी त्यांना घराबाहेर फेकले आणि शाळेचे काम अचानक ठप्प झाले.

गोवंडे पुण्यात आले आणि सावित्रीबाईंना घेऊन अहमदनगरला गेले. ती परत आल्यानंतर केशव शिवराम भावलकर यांनी तिच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली. ज्योतीराव आणि सावित्रीबाईंनी मुलींना आणि मुलांना व्यावसायिक आणि व्यावहारिक शिक्षण देणे, त्यांना स्वतंत्र विचार करण्यास सक्षम बनविणे यावर भर दिला. त्यांचा असा विश्वास होता की ज्या शाळांमध्ये मुले उपयुक्त व्यापार आणि हस्तकला शिकू शकतात आणि त्यांचे आयुष्य आरामात आणि स्वतंत्रपणे व्यवस्थापित करण्यास सक्षम असतील अशा औद्योगिक संस्थेशी जोडले जावे.

त्यांनी आग्रह धरला की, ‘शिक्षणाने एखाद्याला जीवनात योग्य-अयोग्य आणि सत्य आणि असत्य यांच्यात निवडण्याची क्षमता दिली पाहिजे.’ मुला-मुलींची सर्जनशीलता फुलू शकेल अशा जागा निर्माण करण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांचे यश यावरून स्पष्ट होते की तरुण मुलींना त्यांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास करणे आवडते, त्यामुळे त्यांचे पालक मुलींच्या अभ्यासाच्या समर्पणाची तक्रार करतील.

व्यक्ती

ज्योतिराव आणि सावित्रीबाई चालविणाऱ्या वसतिगृहात राहणा्या विद्यार्थ्यांचे तिच्याबद्दल सांगणे खालीलप्रमाणे होते.

मुंबई येथील लक्ष्मण कराडी जया म्हणाल्या, “मी सावित्रीबाईंसारखी दयाळू आणि प्रेमळ दुसरे स्त्री पाहिली नाही. आईने जितके प्रेम केले त्यापेक्षा तिने आम्हाला अधिक प्रेम दिले. ” महादु सहादु वाघोले या दुसर्‍या विद्यार्थ्याने लिहिले, “सावित्रीबाई खूप उदार होत्या आणि तिचे मन दयाळू होते. ती गोरगरीब व गरजू लोकांवर दयाळू होईल. ती सतत अन्नाची भेट देत असे; ती सर्वांना जेवण देणार. गरीब महिलांच्या शरीरावर जर त्यांनी विखुरलेले कपडे पाहिले तर ती त्यांना आपल्याच घरातून साड्या देत असे. यामुळे त्यांचा खर्च वाढला. तात्या (ज्योतिराव) कधीकधी तिला म्हणायचे, ‘इतका खर्च करु नये.’ हसून ती म्हणायची ‘मरणार असताना आपल्याबरोबर काय घ्यावे?’ तात्या काही काळ शांत बसून राहायचे. कारण त्याला या प्रश्नावर काहीच प्रतिसाद नव्हता. ते एकमेकांवर खूप प्रेम करतात. ”

संघर्ष

सावित्रीबाईंचा संघर्ष अनेक अडचणींनी परिपूर्ण होता आणि त्या असूनही तिने शांततेत आपले कार्य चालू ठेवले. पुरुष हेतुपुरस्सर रस्त्यावर थांबायचे आणि जबरदस्तीने बोलणे टाळायचे. त्यांनी कधीकधी दगडफेक केली आणि शेण किंवा चिखल फेकला. शाळेत गेल्यावर सावित्रीबाई दोन साड्या घेऊन जात असत.

एकदा शाळेत गेल्यावर त्या घाणीच्या साडीमधून बाहेर पडायच्या, त्या पुन्हा परत जात असताना परत जात असत आणि तरीही तिने हार मानली नाही. त्यावेळी तिच्यासाठी नेमण्यात आलेल्या गार्डने आपल्या माणसांना काय म्हणायचे याविषयी त्यांनी त्यांच्या आठवणींमध्ये लिहिले आहे: “माझ्या बहिणींना शिकविण्याचे पवित्र कार्य मी जसे करतो तसे तुम्ही फेकले जाणारे दगड किंवा शेण माझ्यासाठी फुलांसारखे वाटतात. देव तुम्हाला आशीर्वाद देईल! ”

जुलै 1887 मध्ये जेव्हा ज्योतिरावांना हृदयविकाराच्या झटक्यामुळे उजव्या बाजूला पक्षाघात झाला, तेव्हा सावित्रीबाईंनी त्यांना रात्रंदिवस पाळले आणि ते पुन्हा पुन्हा लिहिण्यात यशस्वी झाले. त्याच वेळी, त्यांचे आर्थिक संकट शिगेला पोहोचले होते. एका राजकीय ऋषी आणि हितचिंतक मामा परमानंद यांनी त्यांना आर्थिक मदत मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केले.

बडोद्याच्या राजा सयाजीराव गायकवाड यांना लिहिलेल्या पत्रात परमानंद यांनी या जोडप्यात गुंतलेल्या ऐतिहासिक कार्याची नोंद केली आणि सावित्रीबाईंबद्दल पुढील गोष्टी सांगितल्या, “ज्योतिरावपेक्षा त्यांची पत्नी स्तुतीस पात्र आहे. आपण तिचे कितीही कौतुक केले तरी ते पुरेसे ठरणार नाही. तिच्या उंचीचे वर्णन कसे करता येईल? तिने आपल्या पतीसह संपूर्ण सहकार्य केले आणि त्याच्याबरोबर, त्यांच्या परीक्षेत येणाऱ्या सर्व परीक्षांचा आणि क्लेशांचा सामना केला. उच्च जातीतल्या उच्चशिक्षित महिलांमध्येही अशी त्याग करणारी महिला मिळणे कठीण आहे. या जोडप्याने आपले संपूर्ण आयुष्य लोकांसाठी काम केले आहे. ”

ज्योतिराव यांचे निधन झाल्यावर सावित्रीबाई तिथे हजर झाल्या. पालिका परवानगी न मिळाल्यामुळे, आपल्या इच्छेनुसार त्याच्या शरीरावर मीठ टाकून त्याला पुरले जाऊ शकले नाही. त्याला पायरेवर जाळण्यात आले आणि ते सावित्रीबाईंनी धाडसाने पुढे आले आणि मातीची भांडी ठेवली (ते मृताच्या उत्तराधिकारी नेले असे मानले जाते).

तिने ज्योतिरावाच्या अंतिम प्रवासाला नेले आणि त्यांनी त्याचा शरीर ज्वालांमध्ये सामील केले. भारताच्या इतिहासामध्ये बहुधा एखाद्या महिलेने मृत्यूचे संस्कार केल्याची ही पहिलीच वेळ होती. ज्योतिरावांना दफन करायची आहे त्या जागीच तिने राखेसह ‘तुळशी वृंदावन’ उभारले. ज्योतिराव यांच्या निधनानंतर, सावित्रीबाईंनी शेवटपर्यंत सत्यशोधक चळवळीचे नेतृत्व केले. 1893 मध्ये पुण्याच्या सासवड येथे आयोजित सत्यशोधक परिषदेच्या त्या अध्यक्षा होत्या.

अजून वाचा: महात्मा ज्योतिबा फुले यांचा बद्दल माहिती

मृत्यू- अंतिम वर्षे

वर्ष 1897 हे प्लेगच्या धोक्यात आले. पुण्यात दररोज शेकडो लोक मरत होते. अधिकारी रँड यांच्या नेतृत्वात सरकारने साथीच्या आजारावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला. यशवंत यांच्यासह सावित्रीबाई यांनी रूग्णांची काळजी घेण्यासाठी रुग्णालय सुरू केले. ती स्वत: आजारी लोकांना उचलून घेऊन त्यांना दवाखान्यात आणून त्यांच्यावर उपचार करायची. हा रोग संक्रामक आहे हे तिला माहित असले तरीही, प्लेगने स्वत: चा जीव घेईपर्यंत ती त्यांची सेवा करत राहिली.

मुंढवा गावाबाहेर महार वस्तीतील पांडुरंग बाबाजी गायकवाड यांचा मुलगा प्लेगचा त्रास असल्याचे समजताच, ती तेथे गेली आणि आजारी मुलाला पाठीवर घेऊन रुग्णालयात परत गेली. या प्रक्रियेमध्ये तिला हा आजार झाला आणि 10 मार्च 1897 रोजी रात्री 9 वाजता तिचे निधन झाले.

सावित्रीबाईंचा वारसा

  • पुण्यातील सावित्रीबाई फुले यांची अर्ध-प्रतिमा.
  • पुणे सिटी कॉर्पोरेशनने 1983 मध्ये तिच्यासाठी एक स्मारक तयार केले.
  • 2015 मध्ये पुणे विद्यापीठाचे नामकरण त्यांच्या सन्मानार्थ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असे करण्यात आले.
  • 10 मार्च 1998 रोजी फुले यांच्या सन्मानार्थ इंडिया पोस्टद्वारे एक मुद्रांक प्रसिद्ध करण्यात आले.
  • 3 जानेवारी 2019 रोजी, शोध इंजिन गूगलने डूडलसह सावित्रीबाई फुले यांच्या जन्माच्या 188 व्या वर्धापन दिन चिन्हांकित केले.
  • आंबेडकर आणि अण्णाभाऊ साठे यांच्यासमवेत फुले हे विशेषतः दलित मांग जातीसाठी एक चिन्ह बनले आहेत. मानवी हक्क अभियानाच्या स्थानिक शाखांमधील महिला (मानवाधिकार मोहीम, मंग-आंबेडकरवादी संस्था) वारंवार त्यांच्या जयंतीवर (मराठी आणि इतर भारतीय भाषांमध्ये वाढदिवस) मिरवणुका आयोजित करतात.
  • फुले बद्दल 2018 मध्ये कन्नड बायोपिक चित्रपट बनला होता.

आपण काय लक्षात ठेवले पाहिजे

सावित्रीबाईंनी महात्मा ज्योतिराव फुले यांच्यासमवेत महिला, शेतकरी, दलित आणि मागास जातींच्या हक्कांसाठी संघर्ष केला. या दोघांनाही प्रतिक्रियात्मक आणि जातीवादी वर्चस्ववादी शक्तींनी त्यांच्यावर ओढवलेल्या अत्याचारांना धैर्याने सामोरे गेले. मनुवादी आणि ब्राह्मणवादी शक्तींनी जबरदस्त गैरवर्तन करूनही त्यांनी लैंगिक समानतेसाठी आणि जातीव्यवस्थेविरूद्ध संघर्ष केला.

सावित्रीबाईंनी आपल्या शेवटच्या क्षणापर्यंत जातीव्यवस्था आणि इतर सामाजिक दुष्परिणामांच्या निरंकुशतेविरुद्ध लढा दिला. लिंग समानतेसाठी ती एक भक्कम आवाज होती. तिच्यात असलेल्या सामर्थ्यामुळे आणि शक्तीमुळेच असे होते की जेव्हा समाजातील काही विशिष्ट वर्गातील लोक अस्पृश्य म्हणून पाहिले जात असत, तेव्हा तिने त्यांना आपल्या घरात आश्रय दिला आणि त्यांची काळजी घेतली.

तिने ब्राह्मण वर्चस्वाला आव्हान दिले आणि स्त्रियांच्या व अपंग लोकांच्या हक्कांसाठी टिकवलेल्या आणि वीर संघर्षाद्वारे त्यांचे वर्चस्व खंडित केले. तिने मात केली आणि दररोज होणार्‍या छळ व अत्याचारातून ती वाचली आणि इतर स्त्रिया शिकण्याची आणि शिकवण्याची हिम्मत केली.

आमच्या शैक्षणिक संस्थेने आणि राष्ट्रांनी तिच्या इतिहासातील पुस्तके, राष्ट्रवादी मुख्य प्रवाहातील प्रवचन आणि आपल्या स्मरणशक्तीतून तिची जीवनकथा मिटवून दुर्लक्षित केलेल्या उत्थानासाठी संघर्ष केला आहे. वर्णव्यवस्था, ब्राह्मणवाद, पुरुषप्रधानता आणि भेदभाव आणि अस्पृश्यांना वगळण्याच्या तिच्या संघर्षाचा एकूण पुसटपणा हा आपल्या देशाच्या क्रौर्य आणि भारतातील उच्चवर्णीय ब्राह्मण-वर्चस्व असलेल्या ज्ञान उत्पादन व्यवस्थेवरील डाग असल्याचा पुरावा आहे.

लेखन आणि मूल्यवान योगदान

सावित्रीबाई फुले यांच्या कविता आणि इतर लेखन अनेकांसाठी प्रेरणास्थान आहे आणि ते भारताच्या जातीव्यवस्थेविरूद्ध संघर्षात अग्रगण्य आहेत. तिने काही अतिशय मौल्यवान लेखन एकत्र ठेवले आहे.

  • काव्याफुले- कवितासंग्रह, 1854
  • ज्योतिराव यांचे भाषण, सावित्रीबाई फुले संपादित, 25 डिसेंबर 1856
  • ज्योतिरावांना सावित्रीबाईंचे पत्र
  • मातोश्री सावित्रीबाई यांचे भाषण, 1892
  • बावनकाशी सुबोध रत्नाकर, 1892

डॉ. एम. जी. माळी संपादित 194. पानांच्या ‘सावित्रीबाई फुले यांची पूर्ण कामे’ या खंडात ही कामे एकत्र केली आहेत. खंडाचे सुप्रसिद्ध विचारवंत आणि तत्त्ववेत्ता डॉ. सुरेंद्र बर्लिंगे यांचे परिचय आहे. 1854 मध्ये प्रकाशित झालेले ‘काव्यफुले’ हे सावित्रीबाईंच्या कवितांचे पहिले काल्पनशास्त्र होते. यात निसर्ग, सामाजिक विषय, उपदेशात्मक कविता आणि ऐतिहासिक कविता या सारख्या विषयांवर एकूण 41 कविता आहेत.

‘ज्योतिरावांचे भाषण’ हे सावित्रीबाईंनी संपादित केलेले खंड असून त्याचे प्रतिलेखन चार्ल्स जोशी यांनी केले आहे. हे पुस्तक 1856 मध्ये प्रकाशित झाले होते आणि ज्योतिराव यांच्या चार भाषणे आहेत. ‘सावित्रीबाईंचे पत्र ज्योतिराव यांना’ मध्ये ओतूर व नायगाव यांची एकूण तीन पत्रे आहेत. ‘मातोश्री सावित्रीबाईंचे भाषण’ मध्ये सावित्रीबाईंचे इतर उपक्रम, शिक्षण देणे, चांगले आचरण, व्यसन आणि कर्जे यासारख्या विविध विषयांवर भाषणे आहेत. त्यांचे संपादन शास्त्री नरो बाबाजी महाधात पानसरे पाटील यांनी केले आहे आणि वत्सल प्रेस, बडोदा यांनी 1892 मध्ये प्रकाशित केले होते. यात 52 रचना आहेत. ही कविता ज्योतिराव यांच्या निधनानंतर 1891 मध्ये तयार केली गेली होती आणि 1892 मध्ये पुस्तक म्हणून प्रकाशित झाली होती.

सावित्रीबाईंनी आयुष्यभर ज्योतीरावांना जे सहकार्य, सहकार्य आणि सहकार्य दिले ते विलक्षण आहे. पुरुष आणि स्त्रिया यांच्यातील समानतेचा आदर्श आणि त्यांनी ठरविलेल्या शांततापूर्ण सहवासाने, वेळ आणि स्थानाच्या मर्यादा ओलांडल्या आहेत. शिक्षण, सामाजिक न्याय, जाती निर्मूलन आणि पुरोहितशक्ती निर्मूलन या क्षेत्रात त्यांनी केलेली पथ-प्रेरणा केवळ भूतकाळच नव्हे तर सध्याच्या काळालाही प्रकाशित करते. हे सध्याच्या काळातही समांतर नसलेले योगदान आहे. सावित्रीबाईंचा हा वारसा आपले जीवन सदैव समृद्ध करत राहील.

अजून वाचा: लोकमान्य टिळक माहिती मराठी

शिक्षक दिन

1962 पासून भारतात 5 सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून पाळला जातो. या दिवसाचे महत्त्व, जसे की आपल्या सर्वांना शाळांमध्ये शिकवले जाते ते म्हणजे स्वतंत्र भारताचे पहिले उपाध्यक्ष आणि द्वितीय अध्यक्ष डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन (1988-1975) यांची जयंती. आमच्या लोकप्रिय ज्ञानामध्ये शिक्षक, शिक्षक आणि गुरू यांचे भांडवल समज मर्यादित आणि राधाकृष्णन, द्रोणाचार्य आणि मनु यासारख्या उच्चवर्णीय ब्राह्मण पुरुषांपुरते मर्यादित आहे. या आणि इतर ‘गुणवंत’ पुरुषांनी आमच्या इतिहासाला आकार दिला आहे, ज्यामुळे केवळ निम्न जाती आणि बहुजनांनाच त्याच्या प्रवचनातून वगळलेले नाही तर शिक्षणाचा अधिकार आणि विशेषतः शिकवण्याचा हक्क ही ‘जन्मी गुणवंत’ च्या कार्यक्षेत्रातच आहे याची पुष्टी होते. उच्च जाती

याचा प्रतिकार करण्यासाठी लोकांचा एक वर्ग या दिवशी शिक्षकांच्या दिन साजरा करण्याला आव्हान देऊन व नाकारून या मुख्य प्रवाहातील संस्मरणाच्या विरोधात आवाज उठवत आहे. त्याऐवजी ते 3 जानेवारी हा सावित्रीबाई फुले यांचा जन्म दिन, शिक्षण दिन / राष्ट्रीय शिक्षक दिन म्हणून साजरा करीत आहेत.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *