नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्धाचे तत्वज्ञान स्वीकारले. देशाला मानवतावादी संविधान (Constitution) दिले.
संविधानावर देश प्रगती करत आहे, असे स्पष्ट मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी व्यक्त केले.
दीक्षाभूमीवर आयोजित 67 वा धम्मचक्र प्रवर्तन (Dhamma Chakra Pravartan Din 2023) सोहळ्याच्या पर्वावर मंत्री गडकरी बोलत होते. राष्ट्रनिर्माणात बाबासाहेबांचे मोठे योगदान आहे, तर बुद्धाच्या विचारात विश्वकल्याणाचे सूत्र आहे. यामुळे विश्वात याच धम्माच्या विस्ताराने शांती नांदेल, असेही ते म्हणाले.
समता आणि बंधुतेचा आधार हाच बुद्ध धम्म आहे. देशभरातील बौद्ध स्थळे व बौद्ध लेण्या असलेली शहरे जोडण्यासाठी बुद्धिस्ट सर्किटची संकल्पना आणली आहे, ती लवकरच साकारेल असा विश्वासही मंत्री गडकरी यांनी व्यक्त केला.