10.9 C
New York
Sunday, May 12, 2024

Buy now

यूएईच्या वाळवंटात अचानक कसा पडला एका वर्षाचा पाऊस, काय आहे कारण

- Advertisement -

दुबई : यूएईच्या अनेक भागांमध्ये वाळवंट असून ही जोरदार पाऊस झाला. एका दिवसात इतका पाऊस पडला की त्याने ७५ वर्षांचा रेकॉर्ड मोडला. एवढ्या पावसानंतर भयंकर परिस्थिती निर्माण झाली.

- Advertisement -

प्रशासनाला परिस्थितीला तोंड देण्यासाठी कोणतीही उपाययोजना नव्हती. रस्त्यावर पाणीच पाणी होते. महागड्या गाड्या पाण्याखाली होत्या. जगातील सर्वात स्मार्ट शहर दुबईमध्येही ही परिस्थिती पाहून अनेकांना आश्चर्य वाटलं. दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर देखील पाणी होते. त्यामुळे उडाणे बंद करावे लागले. शॉपिंग मॉल्स आणि मेट्रो स्टेशनवर पाणी साचले होते. या पावसाला क्लाऊड सीडिंगमधील त्रुटी कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे.

- Advertisement -

अरब देशांमध्ये अत्यल्प पाऊस

गल्फ स्टेट नॅशनल सेंटर ऑफ मेटिऑरॉलॉजीच्या मते, 15 आणि 16 एप्रिल रोजी ऍलन विमानतळावरून क्लाउड सीडिंगसाठी विमानांनी उड्डाण केले होते. क्लाउड सीडिंग विमानांनी दोन दिवसांत एकूण 7 वेळा उड्डाण केले. कदाचित क्लाउड सीडिंगमधील काही अनियमिततेमुळे इतका पाऊस पडला असेल. यूएईमध्ये अतिवृष्टीसाठी क्लाउड सीडिंगमधील व्यत्यय कारणीभूत असेल, तर आसपासच्या देशांमध्येही जास्त पाऊस का? कारण आखाती अरब देशांमध्ये अत्यल्प पाऊस पडतो. अशा परिस्थितीत हवामान बदलामुळे यूएईमध्ये मुसळधार पाऊस पडत असल्याचेही मानले जात आहे.

ढगफुटीचे कारण काय

मंगळवारी इतका पाऊस झाला की, अनेक भागात पाणी साचले होते. मेघगर्जनेसह पाऊस पडत होता. हवामानशास्त्रज्ञांच्या मते, वातावरणातील हवा स्वतःसोबत उष्णता आणते. दुबई आणि आसपास समुद्र असल्याने धुळीची वादळे येतात. धूळ देखील मेघ सीडरचे काम करते. विज्ञान त्याला कंडेन्सेशन न्यूक्ली म्हणतात. तज्ज्ञांच्या मते, धुळीच्या वादळामुळे क्लाउड सीडिंगमध्ये अडथळा निर्माण झाला होता.

क्लाउड सीडिंग का आवश्यक आहे?

दुबईत पाऊस कमी पडतो. त्यामुळे येथे पाण्याची टंचाई असते. पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी दुबईत विविध प्रयोग केले जातात. काही वर्षांपूर्वी अंटार्क्टिकामधून हिमनदीचा मोठा तुकडा समुद्रमार्गे दुबईत आणण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. यावर मोठा खर्च झाला होता. दुबईमध्ये सर्व प्रयत्न करूनही पाणीटंचाई कायम आहे. या समस्येला तोंड देण्यासाठी दुबई सरकारने क्लाउड सीडिंगद्वारे कृत्रिम पावसाचे नियोजन केले होते. यात चूक झाली. उरलेले काम वातावरणातील धुळीच्या कणांनी पूर्ण केले आणि पाऊस इतका पडला की परिस्थिती बिकट झाली.

- Advertisement -

Related Articles

Latest Articles