7.6 C
New York
Friday, April 19, 2024

Buy now

कड्याच्या बंधाऱ्याची पाणी गळती थांबवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना महिन्याभरापासून मिळेना मुहूर्त

- Advertisement -

 

- Advertisement -

कड्याच्या बंधाऱ्याची पाणी गळती थांबवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना महिन्याभरापासून मिळेना मुहूर्त

- Advertisement -

तहसिलदार,जलसंधारण अधिकारी यांना
प्रत्यक्ष भेटुन केली होती मागणी

 

कडा (प्रतिनिधी) आष्टी
तालुक्यातील कडा या गावातील बंधाऱ्याच्या दरवाजे लावण्याआधी दरवाज्याची दुरुस्ती करून द्यावी व होणारी पाणी गळती थांबवावी या मागणीचे निवेदन शेतकरी संघटनेचे बीड जिल्हा प्रसिद्धीप्रमुख रहेमान सय्यद यांनी दि.१२ आँक्टोबर २०२२ रोजी दिले.त्यावर ना तहसिलदार ना जलसंधारण अधिकारी दोन्हीही जणांनी दाखल घेतली नाही.त्या उलट मनमानी पद्धतीने बंधाऱ्याची दरवाजे आहे तसेच दि.८ नोव्हेंबर २०२२रोजी कामगार लावुन दरवाजे लावण्याचे काम केले हे काम चालू असताना शेतकरी संघटनेचे रहेमान सय्यद त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता दरवाजे दुरुस्ती न करताच बसवले व त्यामुळे पाणी गळती होत आहे हे पाहिल्यानंतर तहसिलदार आष्टी, व जलसंधारण अधिकारी यांना दुरध्वनी वरून हा प्रकार सांगितला व होणारी पाणी गळती थांबवावी म्हणून पुन्हा विनंती केली. त्यानंतर कामगारांनी पाणी गळती थांबवावी म्हणून हास्यास्पद कामगिरी केली पाणी गळती थांबवावी म्हणून नविन शोध लावला तो शोध म्हणजे जुने कपडे,कुजके गोदड्या,पोताडे लावून काम पूर्ण केले. हा घडलेला प्रकार दाखवून देतोय कि, अधिकारी किती कर्तव्यदक्ष पणे कामे पहातात. पाणी गळती थांबवली नाही व दिलेल्या निवेदनाची दखल घेतली नाही. म्हणून रहेमान सय्यद यांनी पुन्हा तहसिलदार व जलसंधारण अधिकारी यांना दि.९ नोव्हेंबर २०२२ रोजी भेटून घडलेला प्रकार सांगितला व स्मरणपत्र देऊन पाणी गळती थांबवावी म्हणून पुन्हा विनंती केली असता ९ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता जलसंधारण अधिकारी कडा येथिल बंधाऱ्याची पहाणी करण्यासाठी आले मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत आहे हे बघितले व खात्री पटेल अशा शब्दांत सांगितले की दोन दिवसात हि पाणी गळती थांबवून देऊ परंतु आजपर्यंत काम केले नाही यावर वरून आष्टी तालुक्यातील यासंबंधित असलेले अधिकारी निवेदन तक्रार अर्ज देऊन महीना होऊन गेला तरीही दखल घेतली नाही. उलटं मनमानी कारभार चा नमुना दाखवत आहे तसेच दरवाजे जुने कुजके चिंध्या, गोधड्या,पोताडे वापरून दरवाजे बंद करून स्वतः चे कर्तव्य पार न पाडता निवेदन, स्मरण पत्र कडे सरळसरळ दुर्लक्ष केले म्हणून आता याची तक्रार जिल्हाधिकारी बीड यांच्याकडे करणार व या मागणीसाठी आंदोलन ही करणार असे शेतकरी संघटनेचे बीड जिल्हा प्रसिद्धीप्रमुख रहेमान सय्यद यांनी सांगितले आहे.

आंदोलन का करावे लागते ?
बंधाऱ्याच्या या मागणीसाठी तहसिलदार यांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे की,आपण तात्काळ आदेशपत्र काढून आम्हाला आंदोलन करण्यापासून वाचवावे.तर जलसंधारण अधिकारी यांना दिलेल्या पत्रात नमूद केले की, मागणी करूनही तुम्ही कामे केली नाही म्हणून आमच्यावर आंदोलन करण्याची वेळ येणार हे खुप वाईटच.
तरी हि दखल घेतली नाही म्हणून आंदोलन करावे लागते.

रहेमान सय्यद
बीड जिल्हा प्रसिद्धीप्रमुख
शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य

✍️✍️हे ही वाचा

नवगण न्युज  वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

नवगण डोअर बीड वर प्रेस करून पहा सुंदर डोअर डिझाईन

लोकशाही न्युज वर प्रेस करा व पहा ताज्या बातम्या

 

- Advertisement -

Related Articles

Latest Articles