Home Blog

भिती दाखविण्यासाठी तिने घेतले पेट्रोल ओतून अन पतीने लावली काडी..

पुणे : दारु पिऊन घरी येऊन मारहाण करणाºया पतीला भिती दाखविण्यासाठी तिने अंगावर थोडेसे पेट्रोल ओतून घेऊन मी मरते आता, असे म्हणाली, त्यावर पतीने काडी ओढून तिला पेटवून दिल्याचा प्रकार समोर आला आहे.

याबाबत अमृता अक्षय कुंजीर (वय २३, रा. वळती, ता. हवेली) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी अक्षय मारुती कुंजीर आणि आशा मारुती कुंजीर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार वळती गावातील फिर्यादीच्या घरी १२ सप्टेबर रोजी दुपारी २ वाजता घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्यावर सध्या ससून रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. फिर्यादी आणि अक्षय कुंजीर यांचा २०२० मध्ये प्रेमविवाह झाला आहे. त्यांना एक मुलगा आहे. अक्षय हा वारंवार दारु पिऊन येऊन मारहाण करतो. १२ सप्टेबरला तो असाच दारु पिऊन आला व घरातील सामानाची तोडफोड करीत होता. यावेळी तिची सासू व सासरे शेतात गेले होते. त्यावेळी अक्षय याने तु घरातून निघून जा, तु घरात रहायचे नाही, असे म्हणाला. त्यावर फिर्यादी यांनी मी मरुन जाते, असे म्हणाल्या. शेतीपंपासाठी आणलेल्या पेट्रोलमधील थोडे पेट्रोल त्याला भिती दाखविण्यासाठी अंगावर ओतले. त्यावेळी त्याने काडे पेटी आणून अंगावर टाकली. त्यामुळे त्या पेटल्या. त्यानंतर त्यानेच फिर्यादीच्या अंगावर पाणी ओतून विझविण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत फिर्यादी यांची छाती, गळा व तोंडास गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर त्यांना ससून रुग्णालयात दाखल केले. तू जर तुला पतीने पेटविले, असे सांगितले तर दवाखान्यात उपचार करणार नाहीत, अशी भिती सासुने दाखविली. त्यामुळे त्यांनी सुरुवातीला लोणी काळभोर पोलिसांना चुलीवर स्वयंपाक करताना अचानक पेट्रोल ओतल्याने भडका होऊन भाजले असे भितीपोटी सांगितले होते. पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक खोसे तपास करीत आहेत.

नवऱ्याच्या खिशात सापडला दुसऱ्याच महिलेचा फोटो; बायकोने संपवले आयुष्य

पती-पत्नीमधील वाद कधी कधी टोक गाठतात तर कधी दोघांमध्ये निर्माण झालेल्या गैरसमजातून भयानक घटनाही घडू शकतात. अशीच एक घटना उत्तर प्रदेशमधील हमरापूर जिल्ह्यात घडली आहे.

एका महिलेने गळफास घेत आत्महत्या केली आहे. आत्महत्येचे कारण ऐकून कुटुंबीयांच्या पायाखालची जमिनच हादरली आहे. महिलेच्या आत्महत्या प्रकरणी पोलिस पुढील कारवाई करत आहेत.

रचना असं आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव असून जवळपास 9 वर्षांपूर्वी हरिप्रसाद अनुरागी याच्यासोबत तिचे लग्न झाले होते. लग्नानंतर सर्व काही व्यवस्थित सुरू होते. मात्र, एक दिवशी अचानक रचनाला तिच्या पतीच्या खिशात एका महिलेचा फोटो सापडला. या कारणावरुन दोघांत खूप वाद झाले. त्याच रागातून तिने गळफास घेत आत्महत्या केली आहे. महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता.

हरिप्रसाद याने दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्यात गैरसमज निर्माण झाले होते. त्यातूनच तिने टोकाचा निर्णय घेतला होता. तसंच, त्याच्या खिशात महिलेचा फोटो कसा आला, याबाबतही त्याने स्पष्ट केले आहे. काही दिवसांपूर्वी तो मित्रासोबत बाहेर गेला होता. त्याचवेळी त्याच्या एका मित्राने एका महिलेचा फोटो खिशातून काढला व रस्त्यावर फेकला. मात्र, हरिप्रसाद याने त्याला यावरुन हटकले. तसंच, रस्त्यावर अशाप्रकार फोटो फेकू नको, असं सांगितले. मात्र तरीही त्याने एकलं नाही. शेवटी नाईलाजाने मी महिलेचा फोटो उचलून खिशात ठेवला आणि घरी निघून आलो. पण नंतर मात्र त्याबद्दल मी साफ विसरुन गेलो, असं हरिप्रसाद यांने पोलिसांना सांगितलं आहे.

हरिप्रसाद याने पुढे सांगितलं की, रचना कपडे धुत असताना तिला माझ्या खिशात महिलेचा फोटो सापडला. त्यावर तिने माझ्यासोबत वाद घालायला सुरुवात केली. पण मी सगळं समजावून सांगीतले तरीदेखील तिने ऐकलं नाही. त्यामुळं आमच्यात खूप वाद झाले. त्यामुळं मी वैतागून घरातून निघून गेलो.

मी घरातून निघून गेल्यावर रचना आतल्या खोलीत गेली आणि दरवाजा बंद केला. माझी आई बाहेरच्या खोलीतच बसली होती. आत गेल्यावर रचनाने गळफास घेत आत्महत्या केली. मला जेव्हा घटनेची माहिती मिळाली तेव्हा मी तातडीने घरी पोहोचलो व तिला रुग्णालयात दाखल केले. मात्र, तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले होते, असं हरिप्रसाद याने पुढे नमूद केलं आहे. हरिप्रसाद आणि रचना दोघांना तीन मुलं असून एक मुलगी आणि दोन मुलं आहेत.

 

 

पक्षाचं काम थांबव, नाहीतर, निनावी पत्राद्वारे धमकी; बीडमध्ये खळबळ

‘बीआरएस पक्षाचे काम थांबव, अन्यथा तुझा दाभोलकर करू’, अशी धमकी बीडच्या गेवराई येथील माजी जिल्हा परिषद सभापतीचे पती तथा बीआरएसचे नेते बाळासाहेब मस्के आणि त्यांच्या पत्नी मयुरी मस्के यांना देण्यात आली आहे.

बीआरएस पक्षाच्या नेत्यासह त्यांच्या पत्नीला गोळ्या झाडून हत्या करण्याची धमकी दिल्याचा खळबळजनक प्रकार बीडमध्ये समोर आला आहे. निनावी पत्राद्वारे, ‘बीआरएस पक्षाचे काम थांबव, अन्यथा तुझा दाभोलकर करू’, अशी धमकी बीडच्या गेवराई येथील माजी जिल्हा परिषद सभापतीचे पती तथा बीआरएसचे नेते बाळासाहेब मस्के आणि त्यांच्या पत्नी मयुरी मस्के यांना देण्यात आली आहे.

तुम्ही दोघे नवरा – बायको गेवराई तालुक्यात शिबीर घेऊन आमच्या नेत्यांचे खच्चीकरण करत आहात. त्यामुळे बीआरएसचे काम थांबव, अन्यथा गोळ्या घालून दाभोलकर करु, अशी धमकी बाळासाहेब मस्के व पत्नी मयुरी खेडकर – मस्के यांना निनावी पत्राद्वारे देण्यात आल्याने तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.

या पत्रात अत्यंत खालची भाषा वापरून खोट्या केसेसमध्ये अडकवून तुरुंगात टाकण्याची धमकी देखील देण्यात आली आहे. याप्रकरणी बाळासाहेब मस्के यांनी माझ्यासह माझ्या कुटुंबातील सदस्यांच्या जिवीतास धोका असल्याची तक्रार दिल्यानंतर अज्ञात व्यक्तीविरोधात गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पत्रात नेमकं काय म्हटलं?

निनावी पत्रात बाळासाहेब मस्के यांना खालच्या पातळीवरील भाषा वापरत संदेश लिहिला आहे. ‘तू बीआरएस पक्षात जाऊन जास्त माजलास का, तुला जास्त झालय का, तू गावोगाव शिबीर घेऊन आमच्या नेत्यांचं खच्चीकरण करत आहे. त्यामुळे तू करत असलेलं राजकारण बंद कर, अन्यथा आमच्या नेत्याचा आदेश आल्यावर तुला गोळ्या घालून तुझा दाभोलकर करु’, अशी धमकी देऊन अत्यंत खालची भाषा वापरली आहे. ही तक्रार दिल्यानंतर अज्ञात व्यक्तीविरोधात गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जन्मदात्या मुलाने वडिलांची हत्या करुण मृतदेह फेकला इंद्रायणीत

परभणी : क्षुल्लक कारणावरून झालेला वादातून जन्मदात्या मुलानेच आपल्या वडिलांची हत्या केल्यानंतर मृतदेह परभणी जिल्ह्यातील इंद्रायणी नदी पात्रात फेकून दिला होता. परभणी पोलिसांनी तत्काळ तपासाचे चक्र फिरवत मृत व्यक्तीची ओळख पटवून, हत्या करणाऱ्या मुलाला बेड्या ठोकल्या आहेत.

मुंजा एकनाथ कटारे असे मृत व्यक्तीचे नाव असून, अशोक मुंजा कटारे असे आरोपी मुलाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘दैठणा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील इंद्रायणी नदी पात्रात रविवारी एका पुरुषाचा अनोळखी मृतदेह आढळून आला होता. मृतदेह सडल्यामुळे परिसरात वास सुटला होता. पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने मृतदेह बाहेर काढला. मृतदेहाची ओळख पटवितांना त्याच्या हातावर नाव गोंदलेले असल्याचे पोलिसांना कळाले. त्यामुळे पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवले असता मयत हा बीड जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे कळाले.

मृत व्यक्तीची ओळख पटल्याने परभणी पोलिसांनी बीडच्या माजलगाव परिसरातील दिंद्रुड येथे जाऊन चौकशी केली असता मुंजा कटारे यांचा घातपात करून त्यांना दिंद्रुड परिसरात जिवे मारून मृतदेह दैठणा परिसरात फेकल्याची त्यांना माहिती मिळाली. मुलगा अशोक कटारे याचा सहभाग असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

यावेळी चौकशीत अशोक कटारे याने वडिलांची हत्या केल्याची कबुली दिली. क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादाचा राग मनात ठेवून वडिलांची हत्या केल्याचे सांगितले. हत्या केल्यावर संगम पाटी ते दिंद्रुड जाणाऱ्या रोडवर जिवे मारून त्यांचा मृतदेह दैठणा हद्दीतील नदी पात्रात फेकल्याचे देखील त्याने सांगितले. त्यामुळे त्याला ताब्यात घेऊन त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

महिला आरक्षण हे विधेयक राजीव गांधींनी आणलेले,यामुळे राजीव गांधींचे स्वप्न पूर्ण होईल; तातडीने अंमलबजावणी करावी

संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी १९ सप्टेंबर रोजी महिला आरक्षण विधेयक (नारी शक्ती वंदन विधेयक) लोकसभेत मांडण्यात आले. सर्वप्रथम कायदामंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी या विधेयकाबाबत सभागृहाला माहिती दिली.

त्यानंतर काँग्रेसच्या वतीने सोनिया गांधी बोलल्या.

सोनिया म्हणाल्या, ‘स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांचा सहभाग सुनिश्चित करणारा कायदा माझे पती राजीव गांधी यांनी पहिल्यांदा आणला होता, तो राज्यसभेत 7 मतांनी अपयशी ठरला. नंतर पीव्ही नरसिंह राव यांच्या सरकारने ते मंजूर केले.

 

त्याचाच परिणाम असा आहे की, देशभरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून आपल्याकडे १५ लाख महिला नेत्या निवडून आल्या आहेत. राजीव यांचे स्वप्न अर्धेच पूर्ण झाले आहे, हे विधेयक मंजूर झाल्याने स्वप्न पूर्ण होणार आहे.

विधेयकाची तातडीने अंमलबजावणी करावी, अशी काँग्रेसची मागणी आहे. सरकारने परिसीमन होईपर्यंत थांबवू नये. याआधी जात जनगणना करून या विधेयकात एससी-एसटी आणि ओबीसी महिलांना आरक्षण द्यावे. यानंतर भाजप खासदार निशिकांत दुबे म्हणाले की, हे फक्त पंतप्रधान मोदींचे विधेयक आहे, ज्याचे लक्ष्य त्यांच्या नावावर असले पाहिजे.

निर्मला सीतारामन, स्मृती इराणी, दिया कुमारी भाजपच्या बाजूने आपले म्हणणे मांडणार आहेत. ही चर्चा सायंकाळी सहा वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदीही भाषण करू शकतात.

या विधेयकानुसार लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये महिलांसाठी ३३ टक्के आरक्षण लागू केले जाईल. लोकसभेच्या 543 जागांपैकी 181 जागा महिलांसाठी राखीव असतील. हे आरक्षण 15 वर्षे टिकेल. यानंतर संसदेची इच्छा असल्यास मुदत वाढवू शकते.

कर्जामध्ये सर्वाधिक वाढ, बचतीमध्ये मोठी घट, RBI चा धक्कादायक अहवाल

भारतीय रिझर्व्ह बँकेने धक्कादायक आकडेवारी जाहीर केली आहे. आकडेवारीनुसार भारतीय कुटुंबांची आर्थिक बचत 2022-23 मध्ये (जीडीपीच्या) 5.1 टक्क्यांच्या 50 वर्षांच्या नीचांकी पातळीवर घसरली आहे.

आरबीआयच्या आकडेवारीनुसार, 2021-22 मध्ये कुटुंबांची आर्थिक बचत 7.2 टक्के किंवा 16.96 लाख कोटी रुपये होती. कोरोना काळात बचत 2020-21 मध्ये 11.5 टक्के (22.8 लाख कोटी) आणि 2019-20 मध्ये 8.1 टक्के होती.

भारतीय कुटुंबांवरील कर्जाचे ओझेही वाढल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे. 2022-23 मध्ये कुटुंबांची कर्जे जीडीपीच्या 5.8 टक्क्यांपर्यंत वाढली, तर 2021-22 मध्ये हा आकडा 3.8 टक्के होता. याचा अर्थ उपभोगाचा काही भाग कर्जातून भागवला जात होता.
2022-23 मध्ये कर्जामध्ये वाढीचा दर हा स्वातंत्र्यानंतरचा दुसरा उच्चांक आहे. यापूर्वी 2006-07 मध्ये त्यात वाढ झाली होती. त्यावेळी कर्जाचा वाढीचा दर 6.7% होता. देशांतर्गत कर्ज देखील 2022-23 मध्ये GDP च्या 37.6% आहे, जे मागील वर्षी 36.9% होते. कोरोना काळात बचत जास्त राहिली कारण त्या काळात लोकांनी आपले खर्च कमी केले होते.

RBI च्या मते, 2022-23 मध्ये वार्षिक आधारावर व्यावसायिक बँकांच्या कर्जामध्ये 54 टक्के वाढ झाली आहे. या कालावधीत जीडीपीच्या तुलनेत लोकांची संपत्ती 10.9% इतकी आहे. 2021-22 मध्ये संपत्ती 11 टक्क्यांहून अधिक होती.

बीड सख्खा भाऊ पक्का वैरी! शेतजमिनीच्या वाटणीवरून; भावानेच भावाला संपवलं

बीडः बीडच्या (Beed) तिप्पटवाडी येथे जमिनीच्या वादातून भावानेच भावाची हत्या केल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. बळीराम ज्ञानदेव शेंडगे (वय 40) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मृत बळीराम शेंडगे हे त्यांच्या वडिलांची जमीन भावांना वाटून मागत होते.

मात्र त्यांचा भाऊ बबन ज्ञानदेव शेंडगे या वाटणी करण्यास टाळाटाळ करत होता. याच वादातून काही दिवसांपूर्वी दोघां भावांमध्ये किरकोळ वाद सुरू असताना बबन शेंडगे याने भाऊ बळीराम शेंडगे यांच्या डोक्यात धारदार शास्त्राने वार केला. या हल्ल्यात बळीराम शेंडगे गंभीर झाले होते. त्यांच्यावर रुग्णालयात होते, मात्र काल त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

महिला आरक्षणाच्या माध्यमातून एकाच जागेवर २ खासदार?

महिला आरक्षणाच्या बाबतीत मोदी सरकारने मोठी खेळी खेळली आहे. केंद्र सरकारच्या या विधेयकात १८० जागांवर दोन खासदार निवडून आणण्याचा प्रस्ताव आहे. म्हणजे या जागांवर महिला खासदारासोबत आणखी एक खासदार असेल.

महिला आरक्षण चक्रीय आधारावर असेल म्हणजे एका निवडणुकीत एक तृतीयांश जागा आणि नंतर इतर जागा, म्हणजे तोच क्रम चालू राहील असं सूत्रांनी सांगितले.

सूत्रांनुसार, सुरुवातीला लोकसभेच्या १८० जागांवर दोन सदस्य असतील. त्यात एससी, एसटी एक तृतीयांश जागा समाजातील सदस्यांसाठी राखीव असतील. २०२७ मध्ये मतदारसंघाच्या फेररचनेनंतर जागांची संख्या वाढवली जाईल आणि त्यानंतर एकल सदस्यत्व लागू केले जाईल. सध्या अनुसूचित जातीसाठी (SC) ८४ आणि अनुसूचित जमातीसाठी (ST) ४७ जागा राखीव आहेत. मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाने सोमवारी महिला आरक्षण विधेयकाला मंजुरी दिली होती. या विधेयकाबाबत अनेक तर्क-वितर्क लावले जात होते. केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल हे आजच लोकसभेत हे विधेयक मांडणार आहेत अशी माहिती आहे. आज तक या हिंदी वृत्तवाहिनीने हा दावा केला आहे.

जवळपास २७ वर्षांपासून प्रलंबित असलेले महिला आरक्षण विधेयक आता संसदेच्या पटलावर येणार आहे. आकडेवारीनुसार, लोकसभेत महिला खासदारांची संख्या १५ टक्क्यांपेक्षा कमी आहे, तर राज्याच्या विधानसभेत त्यांचे प्रतिनिधित्व १० टक्क्यांपेक्षा कमी आहे. या मुद्द्यावर यापूर्वी २०१० मध्ये चर्चा झाली होती. जेव्हा राज्यसभेने गदारोळात विधेयक मंजूर केले होते आणि मार्शलने महिलांसाठी ३३ टक्के आरक्षणाला विरोध करणाऱ्या काही खासदारांना सभागृहाबाहेर काढले होते. मात्र, हे विधेयक लोकसभेत मंजूर होऊ न शकल्याने ते रद्द करण्यात आले.

लोकसभेत १४ टक्के महिला खासदार

सध्याच्या परिस्थितीबद्दल बोलायचे झाले तर लोकसभेत ७८ महिला सदस्य निवडून आल्यात ज्या एकूण ५४३ च्या १५ टक्क्यांपेक्षा कमी आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये सरकारने संसदेत शेअर केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यसभेतही महिलांचे प्रतिनिधित्व सुमारे १४ टक्के आहे. याशिवाय १० राज्यांच्या विधानसभांमध्ये महिलांचे प्रतिनिधित्व १० टक्क्यांपेक्षा कमी आहे, यामध्ये आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, आसाम, गोवा, गुजरात, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, मणिपूर, मेघालय, ओडिशा, सिक्कीम, तामिळनाडू, तेलंगणा, त्रिपुरा आणि पुडुचेरी यांचा समावेश आहे.

महत्त्वाकांक्षी प्रकल्प देशात धावणार ‘वंदे भारत’ स्लिपर कोच, मेट्रो

देशातील धार्मिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक स्थळे आणि आर्थिक राजधान्यांना जोडणारा ‘वंदे भारत’ एक्स्प्रेस हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प वेगाने मार्गक्रमण करू लागल्यानंतर आता त्याचा दुसरा टप्पा सुरू होतो आहे.

‘वंदे भारत’ एक्स्प्रेसबरोबर भारतीय रेल्वेच्या ताफ्यात ‘वंदे भारत स्लिपर कोच’ आणि ‘वंदे भारत मेट्रो’ या दोन प्रकल्पांच्या कामाने गती घेतली आहे. यातील ‘वंदे भारत’ ही दीर्घ पल्ल्याची स्लिपर कोच गाडी मार्च 2024 मध्ये म्हणजेच ऐन लोकसभेच्या रणधुमाळीत रूळावर दाखल होईल, असे नियोजन केले आहे.

‘वंदे भारत’ ही अस्सल भारतीय बनावटीची रेल्वे आहे. या गाडीच्या डब्यांचे काम इंटिग्रल कोच फॅक्टरी (आयसीटी) येथे केले जाते. या संस्थेचे सरव्यवस्थापक बी. जी. मल्ल्या यांनी याला दुजोरा दिला आहे.

याखेरीज ‘वंदे भारत मेट्रो’ ही 12 डब्यांची गाडी बनविण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्याच्या चाचण्या पूर्ण झाल्यानंतर नव्या वर्षाच्या प्रारंभालाच जानेवारी 2024 मध्ये छोट्या अंतरासाठी बनविलेली गाडी जनसेवेसाठी दाखल होईल. ‘वंदे भारत’ ही भारतीय बनावटीची पहिली सेमी हायस्पीड रेल्वे आहे. त्याच्या उभारणीचे काम 2017 च्या मध्याला सुरू झाले होते.

अवघ्या 18 महिन्यांत चेन्नईस्थित आयसीटी येथील प्रकल्पामध्ये या गाडीच्या बांधणीचे काम पूर्ण झाले आणि 15 फेब्रुवारी 1019 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्ली ते हरिद्वार या पहिल्या ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ला हिरवा झेंडा दाखविला होता. ‘वंदे भारत’ प्रकल्पामध्ये बिगर वातानुकूलित 22 डब्यांच्या गाड्याही बनविण्याचा एक प्रकल्पही कार्यरत आहे. त्याचे ‘पुश-पूल ट्रेन’ असे नामकरण केले आहे. या गाड्या 31 ऑक्टोबरपर्यंत मार्गावर धावू शकतील, असे नियोजन करण्यात आले आहे.

अत्याधुनिक सुविधांचा लाभ होणार

देशात सध्या 50 ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ धावत आहेत. या गाड्यांपैकी कोटा-सवाई माधोपूर या विभागात या गाडीने प्रतितास 180 किलोमीटर वेग साध्य करून दाखविला होता.

आता दीर्घ पल्ल्याच्या स्लिपर कोच ‘वंदे भारत एक्स्प्रेस’मुळे प्रवाशांचा वेळ वाचणार आहेच. शिवाय, अत्याधुनिक सुविधांचा लाभ घेण्याची संधीही त्यांना मिळणार आहे.

नवीन संसदेचा श्रीगणेशा! लोकशाहीर मंदिरासाठी इतक्या हजार कोटींचा खर्च

नवीन संसद भवनाचा आज श्रीगणेशा झाला. मंगळवारी 19 सप्टेंबर 2023 रोजी कामकाज सुरु झाले. जुन्या संसद भवनातून नवीन संसद भवनाचा हा प्रवास सर्वांसाठी संमिश्र होता.